शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

महिनाभरात ५ जण आले परदेशातून, तपासणीत सर्वच आले कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून घेतली जातेय दक्षता : विदेशातून येणाऱ्यांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया  : ब्रिटेनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे देशभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. नव्या कोरोनाचा संसर्ग देशात वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ब्रिटनसह इतर देशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळ आणि जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. तसेच त्यांची चाचणी करुन आणि लक्षणे नसल्याची खात्री करुनच त्यांना घरी जाण्याची परवानगी आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. 

स्वतंत्र क्वारंटाईन कक्षब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. या देशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करुन त्यांना तंत्रनिकेतन विद्यालयात तयार केलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे.- डाँ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया. 

एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले ७५४ जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विदेशातून एकूण ७५४ जण परतले आहेत. यात सर्वाधिक नागरिक दुबई येथील आहे. बरेच जण दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हे नागरिक आपल्या स्वगृही परतले आहेत. तर काही नागरिक इतर देशातून परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. 

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांना याची माहिती जिल्हा प्रशासनाने देणे अनिवार्य आहे. यानंतर या नागरिकांची मेडिकलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस शासकीय क्वारंटाईन कक्षात आरोग्य विभागाच्या निदर्शनाखाली ठेवले जात आहे. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या