शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ५ जण आले परदेशातून, तपासणीत सर्वच आले कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून घेतली जातेय दक्षता : विदेशातून येणाऱ्यांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया  : ब्रिटेनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे देशभरात पुन्हा खळबळ उडाली आहे. नव्या कोरोनाचा संसर्ग देशात वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ब्रिटनसह इतर देशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळ आणि जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात पाच जण हे विदेशातून परतले असून यात लंडनहून परतलेल्या दोन जणांचा आणि अमेरिकाहून आलेल्या तीन जणांचा समावेश आहे. या पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात करण्यात आली. यात या पाचही जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. विदेशातून जिल्ह्यात आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. तसेच त्यांची चाचणी करुन आणि लक्षणे नसल्याची खात्री करुनच त्यांना घरी जाण्याची परवानगी आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. 

स्वतंत्र क्वारंटाईन कक्षब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. या देशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करुन त्यांना तंत्रनिकेतन विद्यालयात तयार केलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे.- डाँ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया. 

एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले ७५४ जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विदेशातून एकूण ७५४ जण परतले आहेत. यात सर्वाधिक नागरिक दुबई येथील आहे. बरेच जण दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हे नागरिक आपल्या स्वगृही परतले आहेत. तर काही नागरिक इतर देशातून परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. 

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांना याची माहिती जिल्हा प्रशासनाने देणे अनिवार्य आहे. यानंतर या नागरिकांची मेडिकलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस शासकीय क्वारंटाईन कक्षात आरोग्य विभागाच्या निदर्शनाखाली ठेवले जात आहे. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या