शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

अस्वच्छतेमुळे हागणदारीमुक्त गाव फलक नावापुरतेच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

केशोरी : मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र शासन गाव स्वच्छता अभियान राबवित आले आहे. ही योजना गावागावात पोहोचली आहे. या ...

केशोरी : मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र शासन गाव स्वच्छता अभियान राबवित आले आहे. ही योजना गावागावात पोहोचली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक गावांतील ग्रामपंचायतीने पुरस्कार स्वीकारून गावाच्या प्रथम दर्शनी भागात हागणदारीमुक्त गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे, असे फलक लावून गाव हागणदारी मुक्तीचा गवगवा केला आहे. परंतु या गावात फेरफटका मारला असता गावातील कडेला, सार्वजनिक रस्त्यावर गावाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर नागरिक शौचास बसून घाण करीत असल्याचे चित्र आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात अनेक ग्रामपंचायतींनी गाव स्वच्छता अभियान राबवून शासनाकडून लाखो रुपयांचे पुरस्कार घेतले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे फलक गावाच्या प्रथम दर्शनी भागात लावून गाव स्वच्छतेचा परिचय दिला आहे. पावसाळ्याच्या दिवसात आजाराचे प्रमाण वाढू नये, म्हणून शासनाने गाव स्वच्छता अभियान राबवून गाव हागणदारीमुक्त करण्याची योजना सुरू केली. या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानात भाग घेऊन पुरस्कार प्राप्त केले आहेत. मात्र गाव हागणदारीमुक्त फक्त फलकापुरतेच राहिले आहे. मानवनिर्मित घाणीमुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने कागदोपत्री गाव स्वच्छ झाल्याचा देखावा करण्यात धन्यता मानली आहे. या परिसरातील गावात फेरफटका मारला असता सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, गावाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नागरिक शौचास बसत असल्याचे दिसून येत आहेत. गाव स्वच्छता अभियान राबवून गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोपत्री जाहीर करुून गावाच्या प्रथमदर्शनी स्वच्छ भारत मिशन एक पाऊल स्वच्छतेकडे हागणदारीमुक्त गावात आपले स्वागत आहे. आम्ही गाव स्वच्छ ठेवण्यास कटिबध्द आहोत असे फलक लावले आहेत. काही गावात प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मोफत शौचालय बांधून देण्यात आली, तरीही शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसून घाण निर्माण करीत असल्याचे दिसून येते.