शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवा, आता तरी अंत पाहू नको...; शेतकऱ्याच्या माथी चिंतेच्या रेघोट्या

By कपिल केकत | Updated: August 14, 2023 19:37 IST

तुटीचा फरक दिवसेंदिवस वाढताच

गोंदिया : महिन्यांतील सुरुवातीचे चार दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने आता दडी मारली आहे. ऐन वेळी पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनीला भेगा पडल्या असून जिल्ह्यातील शेती धोक्यात आली आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या माथी चिंतेच्या रेघोट्या दिसत असून त्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे मात्र तुटीतील फरक दिवसेंदिवस वाढत चालला असून, सोमवारी (दि.१४) हा फरक सरासरी ३८२ मिमीवर पोहोचला होता.

यंदा जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने आणखी तीन महिने पावसाचे आहेत हा विचार करून शेतकरी समाधानी होता. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने साथ दिली. मात्र, पाहिजे तेवढा पाऊस जुलै महिन्यातही बरसला नाही. अशात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बरसला नसल्याने तूट पडली. ती तूट कायम असून ऑगस्ट महिन्यात सुरुवातीचे चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने ही तूट काही प्रमाणात कमी झाली व शुक्रवारी (दि.४) सरासरी ७८ मिमीवर आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवसापासून म्हणजेच ५ ऑगस्टपासून पावसाने दडी मारली असून, मधामधात फक्त सरी बरसल्या आहेत.

नियमित पाऊस बरसत नसल्यामुळे मात्र जिल्ह्यातील पावसाची ही तूट दररोज वाढत चालली असून सोमवारी (दि.१४) ही तूट सरासरी ३८२ मिमीवर पोहोचली होती. विशेष म्हणजे, रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली त्यातही फक्त काही वेळच पावसाच्या सरी बरसल्या. एवढ्या पावसाने काहीच फरक पडणार नसून जिल्ह्याला आता नितांत गरज आहे ती दमदार पावसाची. असे न झाल्यास ही तूट आणखी वाढत जाणार व अशातच पावसाळा निघून जाण्याची भीती आहे. यामुळेच शेतकरीच नव्हे तर अवघे जिल्हावासीय ‘देवा, आता तरी अंत पाहू नको, अशी आर्त हाक आकाशाकडे बघून देत आहे.

मागील वर्षी होता पूर, यंदा मात्र ठणठणाटच

मागील १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात झडीचा पाऊस बरसत होता व त्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती होती. संततधार पावसामुळे पावसा-पावसातच स्वातंत्र दिन साजरा करावा लागला होता. यंदा मात्र जिल्ह्यात विपरीत परिस्थिती दिसत आहे. यंदा पाऊस नसून पाण्याची नितांत गरज आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर कराऑगस्ट महिना अर्धा लोटला असला तरीही पावसाचा ताळमेल काही जमता जमत नसल्याची स्थिती आहे. पाऊस नसल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून पिके वाळू लागली आहेत. अशीच स्थिती राहिली तर खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. आता फक्त सप्टेंबर महिना उरला असून तोवर मात्र पिके हातची गेली असणार आहे. अशात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सोमवारी फक्त १.५ मिमी सरासरी पाऊस

५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, फक्त पावसाच्या हलक्या सरीच बरसल्या आहेत. हाच प्रकार रविवारी (दि.१३) सायंकाळी घडला. सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सोमवारच्या आकडेवारीनुसार फक्त १.५ मिमी सरासरी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. या पावसाची काहीच मोजदाद नसून त्याचा काहीच उपयोग नाही. उलट सोमवारी त्यामुळे उकाड्यात वाढ झाली.

अशी वाढत आहे पावसाची तूट (सरासरी)४ ऑगस्ट- ७८ मिमी

७ ऑगस्ट- १०९ मिमी८ ऑगस्ट- १३८ मिमी

९ ऑगस्ट - १७६ मिमी११ ऑगस्ट- ३३५ मिमी

१४ ऑगस्ट - ३८२ मिमीसोमवारी बरसलेला पाऊस (मिमी)गोंदिया- ३.६

आमगाव-०५तिरोडा- ४.३

गोरेगाव- ०.९सालेकसा- ०.०

देवरी- ०.१अर्जुनी-मोरगाव- ०.२

सडक-अर्जुनी- ०.६

- आतापर्यंत बरसलेला पाऊस- ६९५.३ मिमी सरासरी- मागील वर्षी बरसलेला पाऊस- १०७७ मिमी सरासरी