शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला फटका

By admin | Updated: January 7, 2015 22:56 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र परिसरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.या परिसरात धान पिकांवर मोठ्या प्रमाणात मिरचीचे पिक घेतल्या जाते. गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीचे झाडावरील आलेला फुलोर गळून पडला. जोमात आलेल्या मिरचीच्या झाडावरील फुलोरा नाहीसा झाला आहे. त्याच बरोबरच बुरशी जन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. मिरची पिकाची पाणे सुद्धा पिवळी होऊन गळू लागली आहेत. यामुळे मिरचीच्या उत्पन्नात घट येणार असल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केशोरी आणि परिसरात मिरची पिक हे प्रमुख पिक असून मिरची रोपांच्या लागवडीपासून मिरची उत्पादक शेतकरी मिरची पिकाचे उत्पन्न चांगले येण्यासाठी अत्यंत मेहनतीने कष्ट करीत असतो. परंतु वेळोवळी येणाऱ्या ढकाळ वातावरणामुळे मिरची पिकाचे सतत नुकसान होत असल्याने मिरची उत्पन्नात घट होण्यची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था मंभीर झाली आहे. मिरची पिकासाठी लागलेली लागत सुद्धा निघणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादकांचे कंबरडे मोरले आहेत. मिरची पिकाचे कितीही नुकसान झाले तरी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांनी आर्थिक मदत द्यावी अशी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)