शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

चारा टंचाईमुळे पशुपालन झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:47 IST

मागील वर्षी ४० टक्के कमी पर्जंन्यमानामुळे यंदा गोंदिया जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकांसमोर पाळीव जनावरांचे पालनपोषण कसे करावे, अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पशुपालकांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देफटका दुष्काळाचा : विक्रीसाठी बाजारात जनावरांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी ४० टक्के कमी पर्जंन्यमानामुळे यंदा गोंदिया जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकांसमोर पाळीव जनावरांचे पालनपोषण कसे करावे, अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पशुपालकांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रशासन एकीकडे जिल्ह्यात चारा टंचाई नसल्याचे सांगतो. मात्र पशुपालकांना चारा टंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीत हतबल झालेला पशुपालक पाळीव जनावरांना विक्रीसाठी काढत आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारांमध्ये जनावरांची गर्दी वाढत चालली आहे.शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी पशुपालन करतात. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट आदी व्यवसाय करतात. परंतु पशुपालनाचा जोडधंदाच आता पशुपालकांच्या चांगलाच जिव्हारी येत आहे. जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे.शासनस्तरावर बांधण्यात आलेले बंधारे देखील कोरडे असल्यामुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठून करावी, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे खरीप व रबी हंगामात धान पीक उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे.यामुळे वाळलेले वैरणदेखील कमी प्रमाणात पशुपालकांकडे आहे. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चाराही मिळत नाही. किंबहुना पाण्याअभावी पशुपालकांना हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही घेता येत नसल्याने जनावरांचे पालन पोषणच अवघड होऊ लागले आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पशुपालक जनावरांच्या पालन पोषणाला घेवून चांगलेच हतबल झाले आहेत.परिणामी पशुपालक जनावरांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात नेत आहेत. जिल्ह्यातील बाजारांमध्ये दिवसेंदिवस विक्रीसाठी आलेल्या जनावरांची गर्दी वाढत आहे.या गंभीर प्रश्नाकडे शासनाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात पशुपालन संकटात येणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.जनावरांसाठी पाणी पुरवठ्याची गरजकोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.जिल्ह्यात ६ लाख पाळीव जनावरेजिल्ह्यात पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहिले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी व पशुपालक गाय, म्हैस पाळून दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर शेळी, मेंढीदेखील पाळतात. जिल्ह्यात गाय व म्हशीची संख्या ३ लाख ६० हजार ५२९ तर शेळी व मेंढीची संख्या १ लाख ५८ हजार १४५ आहे. त्याचप्रमाणे एका वर्षाखालील वासरू व वघारांची संख्या ६२ हजार ११७ आहे. असे एकूण जिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पाळीव जनावरे आहेत.प्रति दिवस लागतो २४५२ मेट्रिक टन चाराजिल्ह्यातील जनावरांसाठी जिल्ह्यात प्रतिदिवस २ हजार ४५२ मेट्रिक टन चाºयाची गरज असते. यानुरुप जिल्ह्यात धान उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने तसेच वनक्षेत्र असल्याने दरवर्षी चारा टंचाई राहत नाही. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वैरणासह हिरव्या चाºयांची टंचाई काही ठिकाणी दिसून येत आहे.