शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

चारा टंचाईमुळे पशुपालन झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:47 IST

मागील वर्षी ४० टक्के कमी पर्जंन्यमानामुळे यंदा गोंदिया जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकांसमोर पाळीव जनावरांचे पालनपोषण कसे करावे, अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पशुपालकांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देफटका दुष्काळाचा : विक्रीसाठी बाजारात जनावरांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी ४० टक्के कमी पर्जंन्यमानामुळे यंदा गोंदिया जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे पशुपालकांसमोर पाळीव जनावरांचे पालनपोषण कसे करावे, अशी समस्या निर्माण होत आहे. सध्या पशुपालकांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रशासन एकीकडे जिल्ह्यात चारा टंचाई नसल्याचे सांगतो. मात्र पशुपालकांना चारा टंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीत हतबल झालेला पशुपालक पाळीव जनावरांना विक्रीसाठी काढत आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारांमध्ये जनावरांची गर्दी वाढत चालली आहे.शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी पशुपालन करतात. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट आदी व्यवसाय करतात. परंतु पशुपालनाचा जोडधंदाच आता पशुपालकांच्या चांगलाच जिव्हारी येत आहे. जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्न दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे.शासनस्तरावर बांधण्यात आलेले बंधारे देखील कोरडे असल्यामुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठून करावी, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे खरीप व रबी हंगामात धान पीक उत्पादनाला चांगलाच फटका बसला आहे.यामुळे वाळलेले वैरणदेखील कमी प्रमाणात पशुपालकांकडे आहे. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चाराही मिळत नाही. किंबहुना पाण्याअभावी पशुपालकांना हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही घेता येत नसल्याने जनावरांचे पालन पोषणच अवघड होऊ लागले आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पशुपालक जनावरांच्या पालन पोषणाला घेवून चांगलेच हतबल झाले आहेत.परिणामी पशुपालक जनावरांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात नेत आहेत. जिल्ह्यातील बाजारांमध्ये दिवसेंदिवस विक्रीसाठी आलेल्या जनावरांची गर्दी वाढत आहे.या गंभीर प्रश्नाकडे शासनाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात पशुपालन संकटात येणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.जनावरांसाठी पाणी पुरवठ्याची गरजकोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.जिल्ह्यात ६ लाख पाळीव जनावरेजिल्ह्यात पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहिले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी व पशुपालक गाय, म्हैस पाळून दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर शेळी, मेंढीदेखील पाळतात. जिल्ह्यात गाय व म्हशीची संख्या ३ लाख ६० हजार ५२९ तर शेळी व मेंढीची संख्या १ लाख ५८ हजार १४५ आहे. त्याचप्रमाणे एका वर्षाखालील वासरू व वघारांची संख्या ६२ हजार ११७ आहे. असे एकूण जिल्ह्यात ५ लाख ८३ हजार ७९१ पाळीव जनावरे आहेत.प्रति दिवस लागतो २४५२ मेट्रिक टन चाराजिल्ह्यातील जनावरांसाठी जिल्ह्यात प्रतिदिवस २ हजार ४५२ मेट्रिक टन चाºयाची गरज असते. यानुरुप जिल्ह्यात धान उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने तसेच वनक्षेत्र असल्याने दरवर्षी चारा टंचाई राहत नाही. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वैरणासह हिरव्या चाºयांची टंचाई काही ठिकाणी दिसून येत आहे.