शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

योग्य समन्वयातून संकटावर मात

By admin | Updated: June 12, 2016 01:33 IST

पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांना पूर येतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते.

दोन राज्यातील यंत्रणा सज्ज : आंतरराज्यीय पूर नियंत्रण समितीची सभागोंदिया : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांना पूर येतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. मध्यप्रदेशातील सिवनी व बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीकाठावरील अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण होते. येत्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही राज्यातील यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात (दि.१०) आयोजित आंतरराज्य पूर नियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरु न डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, गडचिरोली जिल्हाधिकारी ए.एस.रंगानायक, गोंदियाचे पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भूजबळ, भंडारा पोलीस अधीक्षक विनिता साहू, बालाघाट पोलीस अधीक्षक गौरव तिवारी, बालाघाटचे सहायक जिल्हाधिकारी मेहताबिसंग उपस्थित होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पुरपरिस्थितीच्या काळात संवादाची माध्यमे ही प्रभावीपणे कार्यरत राहावी. प्रत्येक प्रकल्पावर वायरलेस यंत्रणा सुस्थितीत कार्यरत असावी. पोलीस यंत्रणेने सुध्दा या काळात दक्ष राहून काम करावे. या काळात प्रकल्पावर पर्यायी दक्षता पथके तैनात करावी. संवादाची माध्यमे अशावेळी कुचकामी ठरण्यास ही पथके त्या गावात जावून संबंधित गावातील नागरिकांना जागृत करावे. पूरपरिस्थितीच्या काळात गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज राहावे, बोट, होड्या, नावा सुवस्थित असाव्यात. पोहण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींची नावे यंत्रणांकडे उपलब्ध असावी. जी गावे पूरबाधित होतात अशा गावातील ग्रामस्थांची निवास व भोजनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केली जावी. महसूल व पोलीस विभागाची भूमिका या काळात महत्वाची आहे. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारऱ्यांनी सुध्दा सतर्क राहावे. हवामान खात्याने यंदा १३० टक्के पाऊस सांगितल्यामुळे प्रत्येकाने सजग राहावे. कोणतीही अप्रिय घटना या काळात होणार नाही यादृष्टीने काम करावे. प्रकल्पातून पाणी सोडताना इतर प्रकल्पात कार्यरत संबंधित अधिकाऱ्यांना व नदीकाठावरील ग्रामस्थांना पूर्वकल्पना द्यावी.धीरजकुमार यावेळी म्हणाले, बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर उदभवणाऱ्या पुरिस्थतीमुळे नदीकाठावरील गावे प्रभावित होणार आहे. या गावांना पूर्वसूचना देण्यात याव्यात. डॉ.भूजबळ म्हणाले, जे लोक पूरग्रस्त भागात अतिक्र मण करु न राहतात त्यांना तातडीने त्या भागातून हटविण्यात यावे. , बाघ प्रकल्प, पुजारीटोला, बावनथडी या प्रकल्पांची पाणीसाठा क्षेत्र याची माहिती, संजय सरोवरातून पाणी सोडल्यानंतर किती तासात पाणी गोंदिया जिल्ह्यात पोहचते याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता आर.के.ढवळे, मध्यम प्रकल्प गोंदियाचे कार्यकारी अभियंता व्ही.के.निखारे, गोंदिया पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नंदनवार, बाघ इिडयाडोहचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, जलसंधारण विभाग बालाघाट येथील अधीक्षक अभियंता सुनिल सेठी, बालाघाटचे उपविभागीय अधिकारी कामेश्वर चौबे, बालाघाटचे कार्यकारी अभियंता, जलसंधारणचे सुभाष पटेल, शिवणी (मध्यप्रदेश) उपजिल्हाधिकारी के.सी.पराते, कार्यकारी अभियंता सुनिल व्यास, भंडारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.एस.चोपडे, संजय सरोवरचे उपअभियंता एस.के.धकाते, बालाघाट बावनथडीचे उपविभागीय अधिकारी डी.आर.रामटेके, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, संजय सरोवरचे उपविभागीय अधिकारी बी.एस.विदे, उपसा सिंचन मंडळ तिरोडाचे सहायक अभियंता एन.बी.गुरव, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, गडचिरोलीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, चंद्रपूरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)