शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पावसाने पाठ फिरविल्याने पेरण्या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:42 IST

मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर । वरुणराजाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात यंदा खरीपात १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.जून महिन्यातील संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीची कामे आटोपली. जवळपास ९५ टक्के पेरणीची कामे आटोपली आहे. पेरणी केल्यानंतर एका दमदार पावसाची गरज असते. मात्र मागील आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने केलेल्या पेरण्या सुध्दा संकटात आल्या आहे. पंधरा दिवस पाऊस न झाल्यास शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर उष्णतामानात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी रोवणी सुरू केली आहे. या रोवणीला सुध्दा पावसाची गरज आहे. अन्यथा रोवणी वाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत. हवामान विभागाने सुध्दा जुलै ते आॅगस्ट महिन्या दरम्यान १५ दिवसांचा पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यातच आता पाऊस पुन्हा गायब झाला असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर कृषी विभागाने पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास पेरण्या संकटात येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.जलाशयात अल्प पाणीसाठाजिल्ह्यातील छोट्या, मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पात देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जलाशयांना सुध्दा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अन्यथा पुन्हा पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने त्याचा सुध्दा पिकांवर परिणाम होत आहे. तर उकाड्यामुळे नागरिक सुध्दा त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कधी दमदार पाऊस होतो याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती