शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यात पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:09 IST

मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला आहे.

ठळक मुद्देवातावरणात उकाडा वाढला : अपेक्षित पावसाची तूट वाढतच चालली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला आहे.यंदा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगला जोर दाखविला. दमदार पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला व वातावरण ही गार झाले होते. दररोज हजेरी लावत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील पर्जन्याला अपेक्षित सरासरी गाठली जाणार असल्याचे दिसत होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाऊस बरसत नसून त्यात उन्ह तापत असल्याने वातावरण बदलले व उकाडा वाढला आहे. परिणामी सुरूवातीपासूनच अपेक्षित पावसाची आकडेवारी गाठता आलेली नाही.पावसाने दडी मारल्याने प्रामुख्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे. पाऊस बरसत असल्याने जोमाने शेतीच्या कामाला लागलेला शेतकरी आता पुन्हा आकाशाकडे बघत बसला आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता १२ जुलैपर्यंत ३८२.७२ मीमी सरासरी पाऊस बरसने अपेक्षित असतानाच आतापर्यंत २४४.७९ मीमी सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही १३८ मीमी सरासरी पावसाची तूट कायम आहे. त्यात आता दिवस वाढत चालल्याने ही तूट अधिकच वाढत चालली आहे.रोवणी अडकणारसंततधार बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोमाने कामाला लागला होता. त्यात कित्येकांनी रोवणी आटोपली किंवा सुरू केली आहे. तर कित्येकांची रोवणी अद्यापही झालेली नाही. त्यात आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने रोवणी अडकणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदर पावसाच्या खेळीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेच्या सावटात अडकला आहे. दमदार व संततधार पावसासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असतानाच सर्वांच्या व स्वत:च्या पोटासाठी घाम गाळणारा शेतकरी मात्र डोळ््यात पाणी आणून पाण्याची वाट बघत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती