शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट

By admin | Updated: June 13, 2017 01:00 IST

शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही.

प्रवेशबंदी करा : नागरिकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. परिणामी अपघातांच्या प्रमाणात वाढ तर होते. शिवाय रस्त्याचीही पुरती वाट लागत आहे.ट्रक, कंटनेर, ट्रॅक्टर ही मालवाहू वाहने आहेत. या वाहनांत किती टन माल वाहून न्यायचे याचे प्रमाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यलयाने ठरवून दिले आहेत. महामार्गावर जडवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांत प्रमाणापेक्षा जास्तच माल भरलेला असतो. अतिजड वाहने चालवितांना चालकांचे कधी नियंत्रण सुटणार याचा नेम नाही.शिवाय ही वाहने चालविणारे चालक आपली दिशा सोडत नसतात. समोरुन येणाऱ्या वाहन चालकालाच आपले वाहन रस्त्याच्या बाजूला न्यावे लागते. परिणामी अपघात घडतात. रस्ते कितीही मजबूत तयार केले असले तरी ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागणे निश्चितच असते. ओव्हरलोड वाहने रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरत असली तरी रस्त्यावरील खड्यांचा इतर वाहनांनाच अधिक त्रास होतो. त्यामुळे आपल्या मार्गाने गाडी चालवत असतानाही अनेकदा वाहन अपघात घडत असतात. ओव्हरलोड वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली तर ही ओव्हरलोड वाहतूक थांबू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार बिनधास्त सुरू आहे. परिणामी ओव्हरलोड वाहनांची ये-जा मोकाट सुरू असून शहरातील रस्त्यांचे मात्र हाल झाले आहेत. रस्ते उखडून मोठाले खड्डे पडले. याच रस्त्यांवरून आता वाहतूक करावी लागत असून वाहनचालकांची चांगलीच फसगत होत आहे. कित्येकदा खराब रस्त्यांमुळे अपघातही घडत आहेत. हा प्रकार गांभीर्याने घेत ओव्हरलोड वाहनांसाठी विशेष मोहीम राबवून यावर प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे. तेव्हाच रस्त्यांचे हाल व अपघात होणार नाहीत.