शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यात पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धान पिकाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र रोवणीयोग्य पाऊस न झाल्याने  आतापर्यंत केवळ २० टक्के रोवण्या झाल्या आहेत. तर ८० टक्के रोवण्या होणे अद्यापही शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एकूण २९.८ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६३.७ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे शेतकरी चिंतातूर : आतापर्यंत पार पडल्या केवळ २० टक्केच रोवण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. तर हवामान विभागाचे अंदाज यंदा वांरवार खोटे ठरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धान पिकाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र रोवणीयोग्य पाऊस न झाल्याने  आतापर्यंत केवळ २० टक्के रोवण्या झाल्या आहेत. तर ८० टक्के रोवण्या होणे अद्यापही शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एकूण २९.८ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६३.७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सलग पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले अद्यापही कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत अधिक भर पडली आहे. हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज सुरुवातीपासूनच चुकत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. आकाशात दररोज मेघ भरून येतात. मात्र पाऊस हजेरी लावत नसल्याने वातावरणात उकाडा वाढला आहे. त्यामुळे जिल्हावासीय उकाड्याने तर शेतकरी पावसाअभावी चिंतातुर झाल्याचे चित्र आहे.

आठ दिवसात पाऊस न झाल्यास स्थिती गंभीर - ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली आहे. मात्र जे शेतकरी वरथेंबी पावसावरच अवलंबून आहेत त्यांची पावसाअभावी मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यात आठ दिवसात पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती