शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

धान न निसवल्याने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:48 IST

यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देबियाणे कंपनीवर प्रश्नचिन्ह : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.प्राप्त माहितीनुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील सुनील कृषी केंद्रातून यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड हिंगणघाटतर्फे तयार करण्यात आलेल्या जयश्रीराम धानाचे बियाणे खरेदी करुन नवेगावबांध येथील शेतकरी माधव डोंगरवार यांनी आपल्या शेतात लागवड केली. मात्र त्यांनी लागवड केलेले एक ते सव्वा एकरातील सदर कंपनीचे धान निसविलेच नसल्याने त्यांच्यावर राम राम म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुनील कृषी केंद्र व यशोदा हायब्रीड सीड कंपनी कडून नुकसान भरपाई देण्याची मागणी डोंगरवार यांनी केली आहे.सदर कृषी केंद्रातून डोंगरवार यांनी १०-१० किलोच्या चार बॅग जय श्रीराम (गोल्ड) धानाची बियाणे ८ जून २०१८ ला खरेदी केले. त्यांनी त्यांच्या एक हेक्टर आर जमिनीवर लागवड केली. जयश्री राम धान निघण्याची मुदत १३० ते १३५ दिवसाची होती. धानाची रोवणी केल्यानंतर भरपूर मेहनत घेतली. मात्र धान निसविण्याच्या कालावधीत धान निसविलेच नाही. त्यामुळे डोंगरवार यांनी २२ आॅक्टोबरला अर्जुनी मोरगावचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सुनील कृषी केंद्रामार्फत यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड कंपनीला तक्रार केली.मात्र या प्रकरणाकडे अधिकारी व कंपनी लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. डोंगरवार यांनी गट क्र. ६६८ मधील एक हेक्टर आर(अडीच एकर) शेतात धानाची पेरणी करुन रोवणी केली. धान चांगल्याप्रकारे उगवले. मात्र वेळेवर धान निसविलेच नाही. मागील एक महिन्यापासून फक्त २० टक्के धान निसवला दिसतो व उर्वरीत धान पोटरीवर आहे. या २० टक्के निसवलेल्या धानाच्या फुलोºयावर धानाचे लोंबच नाही. त्यामुळे बियाणे कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. तर धान न उगविल्याने त्यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.या प्रकरणाची तक्रार खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली मात्र अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. कंपनीवर कायदेशीर कारवाई करुन नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंगरवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी