शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

धान न निसवल्याने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:48 IST

यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देबियाणे कंपनीवर प्रश्नचिन्ह : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.प्राप्त माहितीनुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील सुनील कृषी केंद्रातून यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड हिंगणघाटतर्फे तयार करण्यात आलेल्या जयश्रीराम धानाचे बियाणे खरेदी करुन नवेगावबांध येथील शेतकरी माधव डोंगरवार यांनी आपल्या शेतात लागवड केली. मात्र त्यांनी लागवड केलेले एक ते सव्वा एकरातील सदर कंपनीचे धान निसविलेच नसल्याने त्यांच्यावर राम राम म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुनील कृषी केंद्र व यशोदा हायब्रीड सीड कंपनी कडून नुकसान भरपाई देण्याची मागणी डोंगरवार यांनी केली आहे.सदर कृषी केंद्रातून डोंगरवार यांनी १०-१० किलोच्या चार बॅग जय श्रीराम (गोल्ड) धानाची बियाणे ८ जून २०१८ ला खरेदी केले. त्यांनी त्यांच्या एक हेक्टर आर जमिनीवर लागवड केली. जयश्री राम धान निघण्याची मुदत १३० ते १३५ दिवसाची होती. धानाची रोवणी केल्यानंतर भरपूर मेहनत घेतली. मात्र धान निसविण्याच्या कालावधीत धान निसविलेच नाही. त्यामुळे डोंगरवार यांनी २२ आॅक्टोबरला अर्जुनी मोरगावचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सुनील कृषी केंद्रामार्फत यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड कंपनीला तक्रार केली.मात्र या प्रकरणाकडे अधिकारी व कंपनी लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. डोंगरवार यांनी गट क्र. ६६८ मधील एक हेक्टर आर(अडीच एकर) शेतात धानाची पेरणी करुन रोवणी केली. धान चांगल्याप्रकारे उगवले. मात्र वेळेवर धान निसविलेच नाही. मागील एक महिन्यापासून फक्त २० टक्के धान निसवला दिसतो व उर्वरीत धान पोटरीवर आहे. या २० टक्के निसवलेल्या धानाच्या फुलोºयावर धानाचे लोंबच नाही. त्यामुळे बियाणे कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. तर धान न उगविल्याने त्यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.या प्रकरणाची तक्रार खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली मात्र अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. कंपनीवर कायदेशीर कारवाई करुन नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंगरवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी