शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

धान न निसवल्याने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:48 IST

यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देबियाणे कंपनीवर प्रश्नचिन्ह : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यशोदा हायब्रिट सीड प्रा.लिमिटेड हिंगणघाट या कंपनीच्या जयश्रीराम धानाची खरेदी करुन लागवड करणाऱ्यां एका शेतकऱ्यावर धान न निसविल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.प्राप्त माहितीनुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील सुनील कृषी केंद्रातून यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड हिंगणघाटतर्फे तयार करण्यात आलेल्या जयश्रीराम धानाचे बियाणे खरेदी करुन नवेगावबांध येथील शेतकरी माधव डोंगरवार यांनी आपल्या शेतात लागवड केली. मात्र त्यांनी लागवड केलेले एक ते सव्वा एकरातील सदर कंपनीचे धान निसविलेच नसल्याने त्यांच्यावर राम राम म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुनील कृषी केंद्र व यशोदा हायब्रीड सीड कंपनी कडून नुकसान भरपाई देण्याची मागणी डोंगरवार यांनी केली आहे.सदर कृषी केंद्रातून डोंगरवार यांनी १०-१० किलोच्या चार बॅग जय श्रीराम (गोल्ड) धानाची बियाणे ८ जून २०१८ ला खरेदी केले. त्यांनी त्यांच्या एक हेक्टर आर जमिनीवर लागवड केली. जयश्री राम धान निघण्याची मुदत १३० ते १३५ दिवसाची होती. धानाची रोवणी केल्यानंतर भरपूर मेहनत घेतली. मात्र धान निसविण्याच्या कालावधीत धान निसविलेच नाही. त्यामुळे डोंगरवार यांनी २२ आॅक्टोबरला अर्जुनी मोरगावचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सुनील कृषी केंद्रामार्फत यशोदा हायब्रिड सीड प्रा. लिमीटेड कंपनीला तक्रार केली.मात्र या प्रकरणाकडे अधिकारी व कंपनी लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. डोंगरवार यांनी गट क्र. ६६८ मधील एक हेक्टर आर(अडीच एकर) शेतात धानाची पेरणी करुन रोवणी केली. धान चांगल्याप्रकारे उगवले. मात्र वेळेवर धान निसविलेच नाही. मागील एक महिन्यापासून फक्त २० टक्के धान निसवला दिसतो व उर्वरीत धान पोटरीवर आहे. या २० टक्के निसवलेल्या धानाच्या फुलोºयावर धानाचे लोंबच नाही. त्यामुळे बियाणे कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप डोंगरवार यांनी केला आहे. तर धान न उगविल्याने त्यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.या प्रकरणाची तक्रार खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली मात्र अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. कंपनीवर कायदेशीर कारवाई करुन नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंगरवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी