शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने १५ गावांत ९४ घरांची पडझड

By admin | Updated: July 27, 2014 00:11 IST

सतत येत असलेल्या पावसाने दोन दिवसात पंधरा गावात ९४ घराची पडझड झाली. यात चांदोरी खुर्द ३, बिहीरीया १, करटी बु.१०, करटी खुर्द ४, अर्जुनी ६, सेजगाव ५, सोनेगाव ९, नहरटोला २,

परसवाडा : सतत येत असलेल्या पावसाने दोन दिवसात पंधरा गावात ९४ घराची पडझड झाली. यात चांदोरी खुर्द ३, बिहीरीया १, करटी बु.१०, करटी खुर्द ४, अर्जुनी ६, सेजगाव ५, सोनेगाव ९, नहरटोला २, बोदा १०, अत्री १०, बाघोली २, बोरा ७, इंदोरा बु. ७, परसवाडा १०, गोंडमोहाडी ८ या गावात घराची पडझड झाली. तलाठी यांनी फोटो घेऊन पंचनामे करणे सुरू झाले आहे.गेल्या तीन दिवसापासून सतत पावसमुळे परसवाडा महसूली मंडळ विभागात २३ जुलैला सर्वाधिक पाण्याची १५३ मिली नोंद घेण्यात आली.मोठ्या प्रमाणात पाण्याने परिसराला वेढले होते. नदी, नाले, तुडुंब भरून वाहत होते. मागील वर्षी याच तारखेला म्हणजे २३ जुलैला ८५.३ मिली पाऊस पडला होता. यावर्षी दुप्पट पडला. परिसरात सतत दोन्ही दिवस २२ जुलैला ७३ मिली पाऊस पडला. चांदोरी खुर्द, बघोली, ढिवरटोली, किडंगीपार रस्ता पाण्यने वेढल्याने गावाचा संपर्क तुटला होता. मध्यप्रदेश, खैरी, खैरलांजीला जाणाऱ्या रस्त्यावर खैरी गावाजवळ नाल्यावर सात फुट पाणी असल्याने तिरोडा-बालाघाट एस.टी.बस सेवा बंद करण्यात आली होती. शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कामे खोळंबली होती. पाणी निघण्यासाठी दोन दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार. काही ठिकाणी नर्सरी धानाचे नुकसान झाले व रोवणी केलेल्या पऱ्हे सडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. परसवाडा येथे राजस्व कार्यालय असून प्रभारी अधिकारी वाहने यांच्याकडे कार्यभार आहे. त्यांच्याकडे राजस्व विभाग आहे किंवा नाही त्यांनाच जाणीव नाही. पूर परिस्थिती, घराची पडझड, अतिवृष्टी बदल दूरध्वनीव्दारे संपर्क केले असता. मला यांची कल्पना नाही, मी काहीच सांगू शकत नसल्याने ते म्हणाले.तहसील कार्यालयाचे राऊत यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मंडळ अधिकारी महिन्यातून एकदा अचानक येत असल्याचे विश्वसनीय सुत्रामाहिती मिळाली आहे. परसवाडा साझा क्र.चे कोतवालच येत नसून महिला तलाठी यानाच सर्व कामे करावी लागत आहेत. ते मुख्यालयात राहत असल्याने त्याच्याकडे पर्जन्यमान मोजमाप करण्याचे काम तहसीलदाराने दिले आहे. यासंदर्भात तलाठी एस.एम.बारसे यांनी तहसीलदाराला यासंदर्भात माहिती दिली. मात्र तहसीलदार याकडे दुर्लक्षपणा करीत आहेत. कामचुकार अधिकारी कोतवाल यांच्यावर उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अतिवृष्टीत घरे पडली, शेतीचे व पिकाचे नुकसान झाले. त्यांचे सर्वेक्षण ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी या तीन्हीच्या मार्फत सही निशी करून अनुदान देण्याची मागणी अतिवृष्टीधारक नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)