शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अतिवृष्टीने १५ गावांत ९४ घरांची पडझड

By admin | Updated: July 27, 2014 00:11 IST

सतत येत असलेल्या पावसाने दोन दिवसात पंधरा गावात ९४ घराची पडझड झाली. यात चांदोरी खुर्द ३, बिहीरीया १, करटी बु.१०, करटी खुर्द ४, अर्जुनी ६, सेजगाव ५, सोनेगाव ९, नहरटोला २,

परसवाडा : सतत येत असलेल्या पावसाने दोन दिवसात पंधरा गावात ९४ घराची पडझड झाली. यात चांदोरी खुर्द ३, बिहीरीया १, करटी बु.१०, करटी खुर्द ४, अर्जुनी ६, सेजगाव ५, सोनेगाव ९, नहरटोला २, बोदा १०, अत्री १०, बाघोली २, बोरा ७, इंदोरा बु. ७, परसवाडा १०, गोंडमोहाडी ८ या गावात घराची पडझड झाली. तलाठी यांनी फोटो घेऊन पंचनामे करणे सुरू झाले आहे.गेल्या तीन दिवसापासून सतत पावसमुळे परसवाडा महसूली मंडळ विभागात २३ जुलैला सर्वाधिक पाण्याची १५३ मिली नोंद घेण्यात आली.मोठ्या प्रमाणात पाण्याने परिसराला वेढले होते. नदी, नाले, तुडुंब भरून वाहत होते. मागील वर्षी याच तारखेला म्हणजे २३ जुलैला ८५.३ मिली पाऊस पडला होता. यावर्षी दुप्पट पडला. परिसरात सतत दोन्ही दिवस २२ जुलैला ७३ मिली पाऊस पडला. चांदोरी खुर्द, बघोली, ढिवरटोली, किडंगीपार रस्ता पाण्यने वेढल्याने गावाचा संपर्क तुटला होता. मध्यप्रदेश, खैरी, खैरलांजीला जाणाऱ्या रस्त्यावर खैरी गावाजवळ नाल्यावर सात फुट पाणी असल्याने तिरोडा-बालाघाट एस.टी.बस सेवा बंद करण्यात आली होती. शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कामे खोळंबली होती. पाणी निघण्यासाठी दोन दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार. काही ठिकाणी नर्सरी धानाचे नुकसान झाले व रोवणी केलेल्या पऱ्हे सडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. परसवाडा येथे राजस्व कार्यालय असून प्रभारी अधिकारी वाहने यांच्याकडे कार्यभार आहे. त्यांच्याकडे राजस्व विभाग आहे किंवा नाही त्यांनाच जाणीव नाही. पूर परिस्थिती, घराची पडझड, अतिवृष्टी बदल दूरध्वनीव्दारे संपर्क केले असता. मला यांची कल्पना नाही, मी काहीच सांगू शकत नसल्याने ते म्हणाले.तहसील कार्यालयाचे राऊत यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मंडळ अधिकारी महिन्यातून एकदा अचानक येत असल्याचे विश्वसनीय सुत्रामाहिती मिळाली आहे. परसवाडा साझा क्र.चे कोतवालच येत नसून महिला तलाठी यानाच सर्व कामे करावी लागत आहेत. ते मुख्यालयात राहत असल्याने त्याच्याकडे पर्जन्यमान मोजमाप करण्याचे काम तहसीलदाराने दिले आहे. यासंदर्भात तलाठी एस.एम.बारसे यांनी तहसीलदाराला यासंदर्भात माहिती दिली. मात्र तहसीलदार याकडे दुर्लक्षपणा करीत आहेत. कामचुकार अधिकारी कोतवाल यांच्यावर उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अतिवृष्टीत घरे पडली, शेतीचे व पिकाचे नुकसान झाले. त्यांचे सर्वेक्षण ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी या तीन्हीच्या मार्फत सही निशी करून अनुदान देण्याची मागणी अतिवृष्टीधारक नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)