शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

चारा पिकांच्या लागवडीतून करणार चारा टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:01 IST

जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात.

ठळक मुद्देदोन हजारांवर शेतकऱ्यांनी केली लागवड : पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात. जिल्ह्यात ३ लाखांवर पशुधन असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची समस्या निर्माण होवू नये, यासाठी जि.प. पशुसंवर्धन विभागाने शेतकºयांना चारा पिकाच्या लागवडीकरिता मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले. दोन हजारावर शेतकऱ्यांनी चारा लागवड केल्याने चार टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.यंदा कमी पावसामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तणस देखील कामी येणार नाही.परिणामी निर्माण होणारी चारा टंचाईची समस्या लक्षात घेवून जि.प.पशुसंवर्धन विभागाने त्याचे पूर्व नियोजन केले आहे.चाºयाअभावी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना चारा लागवडीचा सल्ला देण्यात आला. पाण्याअभावी यंदा जिल्ह्यात रब्बी पिक घेता येणे शक्य नसल्यामुळे शेतकºयांनी कमी पाण्याच्या चारा पिकाचे उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक पंचायत समितीला बियाणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.पंचायत समितीने ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वळते केले. प्रत्येक शेतकऱ्याला चारा बियाणे खरेदीसाठी ६६६ रूपये देण्यात आले. जनावरांची चाऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे २० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती.यापैकी १४ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला आहे.जनावरांसाठी चाºयाची समस्या निर्माण होवू नये, यासाठी ओलीताची सोय असणाºया शेतकºयांना चारा उत्पादनासाठी बियाणे उपलब्ध करुन देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे चारा टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे.- राजेश वासनिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया.