शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कुवाढास नाल्याच्या पुरामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: August 27, 2014 23:41 IST

चिचटोला गावाजवळील कुवाढास नाला नेहमी पुराच्या वेढ्यात असतो. या मार्गावर चिचटोला ते झालीया व पिपरटोला धानोलीकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद असतो. सतत पुरामुळे झालीया व कावराबांध

आमगाव : चिचटोला गावाजवळील कुवाढास नाला नेहमी पुराच्या वेढ्यात असतो. या मार्गावर चिचटोला ते झालीया व पिपरटोला धानोलीकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद असतो. सतत पुरामुळे झालीया व कावराबांध येथे शाळेत शिकणारे विद्यार्थी जिव धोक्यात घालून पुरातून जातात किंवा नाल्यास जास्त पुराने वेढले तर शाळेत जात नाही. त्यामुळे मुलांच्या भविष्याला धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आमगाव येथे अनेकदा लेखी तक्रार करून विभागाचे डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चिचटोला गावावरून झालीया, पिपरटोला पुढे धानोलीकडे जाणारे मोठ्या प्रमाणात आहे. याच मार्गानी शालेय विद्यार्थी झालीया, कावराबांध येथे शिक्षण घेण्याकरिता येतात. कुवाढास नाल्या जवळ बाघनदी वाहत आहे. नदीला पाणी सोडले की उलट पाणी नाल्यात येतो. नाल्यावर छोटा पाईप टाकून नाला आहे. मात्र नाल्यावर ४ ते ५ फूट पाणी असतो. एवढ्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थी जीव धोक्यात टाकून शिक्षण घेण्याकरिता जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की नाला तुडूंब भरून जातो. तेव्हा विद्यार्थी शाळेत जात नाही. सतत दोन महिने या नाल्यावर पाणी वाहत आहे. या मार्गावर विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव शासकीय कामे, बाजार, बँक इत्यादी कामाकरिता या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असतो. मात्र मागील दोन महिन्यापासून ग्रामस्थांना मोठी कसरत करून पुरातून जावे लागते. काही दिवसापूर्वी पिपरटोला येथील एका मुलीचे निधन आजारपणामुळे झाले. नाल्यास पूर नसता तर तिला प्राथमिक उपचारासाठी आमगाव येथे नेता आले असते. नाल्यास पुर ही नेहमीचीच बाब झाल्याने गावात व परिसरातील झोला छाप डॉक्टराची चांदी आहे. उपचार करून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल रुग्णांकडून करतात अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सदर कुवाढास नाल्याची उंची वाढविण्यासंदर्भात किंवा नविन पूल तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाण्यातून पुलावरून जातांना मोठी विपरीत घटना होण्यास क्षणाचा विलंब लागणार नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आमगाव येथे वर्षाकाठी दोन ते तिन वेळा लेखी मागणी करण्यात तात्पुरते पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. मात्र उपविभागीय अभियंता शरद क्षत्रिय व शाखा अभियंता ढोमणे यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी वेळ नाही. केवळ डोळेझाक करून वेळकाढूपणाचे धोरण येथील अधिकाऱ्यांचे सुरू आहे. पिपरटोला सरपंच अमरलाल लिल्हारे, सरपंच सावंगी सुमिद्र उपराडे, उपसरपंच गीता भेदे, चैतराम देशकर, पुष्पा नागपुरे यांनी या मार्गावरील पुलावर व बाजूला पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)