शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

कुवाढास नाल्याच्या पुरामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: August 27, 2014 23:41 IST

चिचटोला गावाजवळील कुवाढास नाला नेहमी पुराच्या वेढ्यात असतो. या मार्गावर चिचटोला ते झालीया व पिपरटोला धानोलीकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद असतो. सतत पुरामुळे झालीया व कावराबांध

आमगाव : चिचटोला गावाजवळील कुवाढास नाला नेहमी पुराच्या वेढ्यात असतो. या मार्गावर चिचटोला ते झालीया व पिपरटोला धानोलीकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद असतो. सतत पुरामुळे झालीया व कावराबांध येथे शाळेत शिकणारे विद्यार्थी जिव धोक्यात घालून पुरातून जातात किंवा नाल्यास जास्त पुराने वेढले तर शाळेत जात नाही. त्यामुळे मुलांच्या भविष्याला धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आमगाव येथे अनेकदा लेखी तक्रार करून विभागाचे डोळेझाक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चिचटोला गावावरून झालीया, पिपरटोला पुढे धानोलीकडे जाणारे मोठ्या प्रमाणात आहे. याच मार्गानी शालेय विद्यार्थी झालीया, कावराबांध येथे शिक्षण घेण्याकरिता येतात. कुवाढास नाल्या जवळ बाघनदी वाहत आहे. नदीला पाणी सोडले की उलट पाणी नाल्यात येतो. नाल्यावर छोटा पाईप टाकून नाला आहे. मात्र नाल्यावर ४ ते ५ फूट पाणी असतो. एवढ्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थी जीव धोक्यात टाकून शिक्षण घेण्याकरिता जातात. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की नाला तुडूंब भरून जातो. तेव्हा विद्यार्थी शाळेत जात नाही. सतत दोन महिने या नाल्यावर पाणी वाहत आहे. या मार्गावर विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव शासकीय कामे, बाजार, बँक इत्यादी कामाकरिता या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असतो. मात्र मागील दोन महिन्यापासून ग्रामस्थांना मोठी कसरत करून पुरातून जावे लागते. काही दिवसापूर्वी पिपरटोला येथील एका मुलीचे निधन आजारपणामुळे झाले. नाल्यास पूर नसता तर तिला प्राथमिक उपचारासाठी आमगाव येथे नेता आले असते. नाल्यास पुर ही नेहमीचीच बाब झाल्याने गावात व परिसरातील झोला छाप डॉक्टराची चांदी आहे. उपचार करून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल रुग्णांकडून करतात अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सदर कुवाढास नाल्याची उंची वाढविण्यासंदर्भात किंवा नविन पूल तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाण्यातून पुलावरून जातांना मोठी विपरीत घटना होण्यास क्षणाचा विलंब लागणार नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आमगाव येथे वर्षाकाठी दोन ते तिन वेळा लेखी मागणी करण्यात तात्पुरते पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. मात्र उपविभागीय अभियंता शरद क्षत्रिय व शाखा अभियंता ढोमणे यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी वेळ नाही. केवळ डोळेझाक करून वेळकाढूपणाचे धोरण येथील अधिकाऱ्यांचे सुरू आहे. पिपरटोला सरपंच अमरलाल लिल्हारे, सरपंच सावंगी सुमिद्र उपराडे, उपसरपंच गीता भेदे, चैतराम देशकर, पुष्पा नागपुरे यांनी या मार्गावरील पुलावर व बाजूला पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी केली आहे. अन्यथा कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)