शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त यादीतून वगळल्याने विकासनिधीला कात्री

By admin | Updated: December 29, 2014 01:42 IST

राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे,

गोंदिया : राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना खा.पटेल यांनी जिल्ह्यातील अनेक कामांच्या प्रगतीला राज्य व केंद्र सरकारकडून कशी खिळ बसत आहे याचे विवेचन केले. गेल्यावर्षी आपले सरकार असताना अशाच पद्धतीने काही तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले होते. जिल्हा नक्षलग्रस्त असणे ही काही भूषणावह बाब निश्चितच नाही. पण मागास जिल्ह्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागू नये, येथे काम करण्यास इच्छुक नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यामधून त्यांना येथे काम करण्यास प्रवृत्त करावे ही भूमिका ठेवून मी सरकारदरबारी शब्द टाकला. आ.राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आणि पुन्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना नक्षलग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ केले होते. मात्र नवीन सरकारने हा निर्णय पुन्हा फिरवून या जिल्ह्याच्या विकासनिधीला कात्री लावली आहे, अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली.गेल्यावर्षी आम्ही धानाला हमीभावासोबत बोनस मिळून प्रतिक्विंटल १५४० आणि १५१० असा भाव दिला. पण नवीन सरकारकडून केवळ १३६० रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यातही अनेक ठिकाणी कमी भावात शेतकऱ्यांकडील धान खरेदी करून त्यांची पिळवणूक सुरू आहे. सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विद्यमान खासदारांनी (नाना पटोले) धानाला ५००० रुपये हमीभाव देण्याची मागणी संसदेत केली. आम्हालाही असे वाटते. संसदेच्या अधिवेशनात शून्य तासात मी सुद्धा धानाला खर्चावर आधारित योग्य भाव देण्याची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात सरकारने भ्रमनिरासच केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ मोठमोठ्या गोष्टी करून चालणार नाही तर आता करून दाखवावे लागेल, असा टोलाही खा.पटेल यांनी लगावला.यावेळी पटेल यांनी राज्य व केंद्र सरकारमधील राजकीय घडामोडींवरही मनमोकळेपणाने चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेल्या जवळीकबद्दल त्यांना छेडले असता आपले सर्वांशीच चांगले संबंध आहेत, असे सांगून याचा वेगळा अर्थ काढू नये, असे ते म्हणाले. यावेळी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)