शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

नक्षलग्रस्त यादीतून वगळल्याने विकासनिधीला कात्री

By admin | Updated: December 29, 2014 01:42 IST

राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे,

गोंदिया : राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारने जिल्ह्यातील चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. यामुळे जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनेक विकास योजनांच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना खा.पटेल यांनी जिल्ह्यातील अनेक कामांच्या प्रगतीला राज्य व केंद्र सरकारकडून कशी खिळ बसत आहे याचे विवेचन केले. गेल्यावर्षी आपले सरकार असताना अशाच पद्धतीने काही तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले होते. जिल्हा नक्षलग्रस्त असणे ही काही भूषणावह बाब निश्चितच नाही. पण मागास जिल्ह्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागू नये, येथे काम करण्यास इच्छुक नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या निमित्ताने मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यामधून त्यांना येथे काम करण्यास प्रवृत्त करावे ही भूमिका ठेवून मी सरकारदरबारी शब्द टाकला. आ.राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आणि पुन्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना नक्षलग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ केले होते. मात्र नवीन सरकारने हा निर्णय पुन्हा फिरवून या जिल्ह्याच्या विकासनिधीला कात्री लावली आहे, अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली.गेल्यावर्षी आम्ही धानाला हमीभावासोबत बोनस मिळून प्रतिक्विंटल १५४० आणि १५१० असा भाव दिला. पण नवीन सरकारकडून केवळ १३६० रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यातही अनेक ठिकाणी कमी भावात शेतकऱ्यांकडील धान खरेदी करून त्यांची पिळवणूक सुरू आहे. सरकारचे ‘अच्छे दिन’ हेच आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विद्यमान खासदारांनी (नाना पटोले) धानाला ५००० रुपये हमीभाव देण्याची मागणी संसदेत केली. आम्हालाही असे वाटते. संसदेच्या अधिवेशनात शून्य तासात मी सुद्धा धानाला खर्चावर आधारित योग्य भाव देण्याची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात सरकारने भ्रमनिरासच केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ मोठमोठ्या गोष्टी करून चालणार नाही तर आता करून दाखवावे लागेल, असा टोलाही खा.पटेल यांनी लगावला.यावेळी पटेल यांनी राज्य व केंद्र सरकारमधील राजकीय घडामोडींवरही मनमोकळेपणाने चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेल्या जवळीकबद्दल त्यांना छेडले असता आपले सर्वांशीच चांगले संबंध आहेत, असे सांगून याचा वेगळा अर्थ काढू नये, असे ते म्हणाले. यावेळी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)