शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

रब्बी पिकांमुळे विहिरी पडू लागल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:11 IST

गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला.

पाण्याची पातळी ७० टक्के पर्यंत खाली : उन्हाळ्यात भासणार पाणी टंचाई केशोरी : गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला. उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने गावातील विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन कोरड्या पडण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रुप धारण करु पाहत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन धान पिकासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे रबी पिकाची लागवड केली आहे. गावालगत जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअर मारुन २४ तास विद्युत मोटार चालू राहील. या अपेक्षेने पाण्याचा स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा उपसा करण्याचा सपाटा सुरु केला आहे. पावसाळी धान पिकापेक्षा रबी धान पिकाचे उत्पन्न जास्त होत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा कल उन्हाळी धानपिकाकडे जास्त आहे. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यापर्यंत गावातील विहिरीचे पाणी मिळणे आवश्यक असते. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्के पर्यंत कमी झाली आहे. सध्या फेबु्रवारी महिना सुरु आहे. उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटायला लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रकरणी कृषी विभागाने विशेष लक्ष घालून रबी पिकासाठी लागणारा आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा न करता पाण्याचा योग्य वापर करुन रबी धानपीक काढण्याचा शिबिराचे आयोजन करुन सल्ला द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)