शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

रब्बी पिकांमुळे विहिरी पडू लागल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:11 IST

गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला.

पाण्याची पातळी ७० टक्के पर्यंत खाली : उन्हाळ्यात भासणार पाणी टंचाई केशोरी : गावालगत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात बोअर करुन पाण्याचा स्त्रोत निर्माण केला. उन्हाळी धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने गावातील विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन कोरड्या पडण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रुप धारण करु पाहत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन धान पिकासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे रबी पिकाची लागवड केली आहे. गावालगत जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअर मारुन २४ तास विद्युत मोटार चालू राहील. या अपेक्षेने पाण्याचा स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा उपसा करण्याचा सपाटा सुरु केला आहे. पावसाळी धान पिकापेक्षा रबी धान पिकाचे उत्पन्न जास्त होत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा कल उन्हाळी धानपिकाकडे जास्त आहे. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यापर्यंत गावातील विहिरीचे पाणी मिळणे आवश्यक असते. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्के पर्यंत कमी झाली आहे. सध्या फेबु्रवारी महिना सुरु आहे. उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटायला लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रकरणी कृषी विभागाने विशेष लक्ष घालून रबी पिकासाठी लागणारा आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा न करता पाण्याचा योग्य वापर करुन रबी धानपीक काढण्याचा शिबिराचे आयोजन करुन सल्ला द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)