शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

गोंदिया जिल्ह्यातील २१ गावांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:46 IST

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९२० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात तिरोडा तालुक्यातील ७ आणि गोंदिया तालुक्यातील १४ अशा एकूण २१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे.

ठळक मुद्दे८९९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर : शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : महसूल विभागातर्फे दरवर्षी खरीप हंगामातील पैसेवारी काढली जाते. यावरून जिल्ह्यातील किती गावात नेमकी दुष्काळी परिस्थिती आहे, हे काढून त्या गावांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील एकूण ९२० गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात तिरोडा तालुक्यातील ७ आणि गोंदिया तालुक्यातील १४ अशा एकूण २१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे, तर ८९९ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्यावर असल्याने या गावांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार नाही.

गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील एकूण ४० गावांना बसला होता. नदीकाठालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाला मुकावे लागले होते. या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेकडून सर्वेक्षणसुध्दा करण्यात आले होते. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ २१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दाखविली आहे, तर तब्बल ८९९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर दाखवली आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ७९ पैसे आहे. त्यामुळे आता या २१ गावातीलच शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही अन्यायकारक असून, ती रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

या मिळणार सवलती

५० पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांना शासनाकडून काही सवलती दिल्या जातात. यात शेतकऱ्यांचा शेत सारा माफ केला जातो. वीजबिलात ३३ टक्के सवलत दिली जाते. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाते. शिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाते.

 

टॅग्स :droughtदुष्काळ