शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

द्रोणाचार्यालाच अंगठा मागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:54 IST

ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत व्हावे.

ठळक मुद्देदिनानाथ वाघमारे : पुतळा अनावरणप्रसंगी आधुनिक एकलव्य होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत व्हावे. आपले पूर्वज एकलव्य यांनी जसे गुरूदक्षिणा म्हणून अंगठा दिला, तसा अंगठा आता समाज बांधवाने कोणत्याही द्रोणाचार्याला देवू नये. उलट आधुनिक एकलव्य बणून तुम्ही त्याला अंगठा मागा, असे प्रतिपादन संघर्ष वाहिनीचे संयोजक दिनानाथ वाघमारे यांनी केले.मुंगली-नवेगाव येथे वीर धनुर्धर एकलव्य यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.सदर पुतळा माजी खा. नाना पटोले यांनी दिला असून तो मूर्तीकार सोनवाने (प्रतापगड) यांनी तयार केला. उद्घाटन किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून मत्स्यजीवी संघ नवी दिल्लीचे माजी संचालक संजय केवट व अतिथी म्हणून मनोहर चंद्रिकापुरे, के.एन. नान्हे, अशोक शेंडे, सरपंच नाजुका कोडापे, उमराव मांढरे, यशवंत दिघोरे, वासुदेव खेडकर, नरले, चाचेरे, उपसरपंच बाबुलाल भैसारे उपस्थित होते.वाघमारे म्हणाले, संपूर्ण भारतात १७ टक्के लोक सदर समाजातील आहेत. ते अतिशय दारिद्र्यात जीवन जगत आहेत. सरकार कधी जागे होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.इंजि. केवट आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, भटक्या जाती, विमुक्त जमाती या प्रवर्गांतर्गत अतिशय अज्ञानी, दारिद्र्य भटके जीवन जगणारे लोक असून आम्हाला अनुसूचित जाती-जमातीमध्ये सरकारने समाविष्ट करावे. त्यामुळे या समाजाची आर्थिक उन्नती होईल. मात्र असे न करता सरकारने उलट एनटीचे व्हीजेएनटी, एनटी-बी, एनटी-सी., एनटी-डी असे चार गट करून समाजाचे पाय तोडले. असे गट रद्द करुन सरकारने या समाजाला सामाजिक, राजकीय आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.सकाळी संपूर्ण मुंगली गावात स्वच्छता अभियान व प्रभातफेरी काढण्यात आली. त्यांतर पुतळा अनावरण व महाप्रसाद वितरण करण्यात आले. तर रात्रीला मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कार्यक्रमासाठी नंदलाल कोल्हे, राजू कांबळे, हरिचंद्र कोल्हे, विजय मेश्राम, प्रदीप मेश्राम, मोहन मेश्राम, ईश्वर मेश्राम, श्यामराव ठाकरे, विश्वनाथ मेश्राम, दुधराम कांबळे यांनी सहकार्य केले.