शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:04 IST

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. अशात मात्र चारचाकी वाहनांमुळे बाजारातील ठिकठिकाणी ट्राफीक जामचे चित्र आहे.

ठळक मुद्देबाजारात होते ट्राफीक जाम : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. अशात मात्र चारचाकी वाहनांमुळे बाजारातील ठिकठिकाणी ट्राफीक जामचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास होत असून चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसच दिसत नसल्याने त्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरिकांना अधिकच त्रास होत आहे.बाजारातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यात आता दिवाळीच्या खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे. बहुतांश नागरिक आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांनी बाजारात येत असल्याने त्यांची वाहनेही दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. अशात रस्ते अधिकच अरूंद होत असून उरलेल्या जागेतूनच वाहतूक करावी लागते. यात दुचांकीचे तर ठीक आहे मात्र एखादे चारचाकी वाहन बाजारात शिरल्यास पूर्ण रस्ताच घेरला जातो व त्यानंतर वाहतुकीची गोची होते.आजघडीला दररोज हे प्रकार घडत असून ट्राफीक जामच्या या समस्येमुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे. वाहतुकीच्या कोंडीकडे बघता आता बाजारात गाडी घेऊन येणे नागरिकांना डोकेदुखी वाटू लागले आहे. आणि यासाठी कारणीभूत मात्र चारचाकी वाहनांचा बाजारात प्रवेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बाजारातील सध्याची गर्दी बघता चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी करण्याचे नागरिक बोलू लागले आहेत.वाहतूक पोलिसांची दुचाकींवर कारवाईबाजारात एखादी दुचाकी रस्त्याच्या कडेला जरी उभी दिसली, तरी वाहतूक पोलिसांकडून चालान फाडले जात असल्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत. एखादी दुचाकी उभी असली तरी तिच्यापासून जेवढा त्रास होत नसतो तेवढा त्रास मात्र एका चारचाकीमुळे होतो व हे चित्र उघड आहे. तरीही वाहतूक पोलीस चारचाकीवाल्यांना सोडून दुचाकीवाल्यांवरच चालानची कारवाई करीत आहे.