शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत समाज निर्माण झाला नाही

By admin | Updated: March 1, 2016 01:10 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हावा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र दिला.

पालकमंत्र्यांची खंत : चिचगड येथे भीम मेळावागोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हावा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र दिला. त्यांना या देशात धर्मनिरपेक्ष समाज रचना निर्माण करायची होती. १९५६ मध्ये बुध्द धम्माचा स्विकार करून त्यांनी समाजाच्या प्रगतीचे स्वप्न बघितले. परंतू त्यांना अभिप्रेत असलेला समाज आजवर निर्माण झाला नाही, अशी खंत पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्ती केली.देवरी तालुक्यातील चिचगड येथील भीमभूमीवर रविवारी बौध्द समाज संस्था चिचगडच्या वतीने आयोजित भीम मेळाव्यात अध्यस्थानावरून बडोले बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन खा.अशोक नेते यांनी केले. आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद सदस्य अलताफभाई हमीद, उषा शहारे, भाजपाचे महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, किसन जांभूळकर, नरेंद्र शहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले, समाजातील ९० टक्के लोक भूमीहीन आहेत. देशातील ओबीसी, एससी व एसटी हा समाज मागास नसला पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आजही त्यात फार बदल झालेला नाही. मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी बाबासाहेबांनी त्या काळात आंदोलने केली. आरक्षणामुळे समाजाची स्थिती फार मोठी बदललेली नाही. दारिद्रयरेषेखाली राज्यात एससी एसटीची संख्या मोठी आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती शक्य आहे. भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बांधवांसाठी प्रथम तरतूद केली. त्यानंतर एससी व एसटी प्रवर्गासाठी केली, असे सांगून बडोले म्हणाले, सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारली तरच प्रगती होईल. हे केवळ शिक्षणामुळेच शक्य आहे. भीमभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण छत्तीसच्या छत्तीसही योजनेतून जास्तीत जास्त मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही पालकमंत्री बडोले यांनी दिली. उद्घाटक म्हणून बोलताना खा.नेते म्हणाले, येथील भिमभूमीच्या बांधकामासाठी १० लक्ष रु पये निधी देण्यात येईल अशी घोषणा केली. आमदार पुराम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचा मी पाईक आहे. समाजाने पोटजातीत भेदभाव करु नये. आदिवासी व दलीत बांधवांचा विकास झाला पाहिजे. कोणत्याही धर्मावर टिका करु नका असे सांगून भीमभूमीच्या बांधकामासाठी ५ लक्ष रुपये निधी देणार असल्याचे पुराम यांनी सांगितले. महापुरुषांचे पुतळे गावोगावी उभारण्यापेक्षा त्यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे म्हणाल्या. या कार्यक्रमाला देवरीसह अन्य तालुक्यातील बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)