शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दतोरा झाले जलसमृद्ध गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:01 IST

मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या समस्येवर मात : जि.प. लघु सिंचन विभागाचा उपक्रम

देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे. त्यामुळे दरवर्षी निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या समस्येवर पूर्णपणे मात करण्यास यश आले आहे.सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनात गोंदिया तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला होता. यात दतोरा गावाचा समावेश आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाच्या मध्यभागी असलेला माजी मालगुजारी तलाव ब्रिटिश काळापासून पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे.परंतु मागील १५ ते २० वर्षांत या तलावाच्या जलआवक क्षेत्रात निवासी क्षेत्र निर्माण झाल्याने व सिमेंट-काँक्रिटचे उंच रस्ते तयार केल्याने तलावात येणारा प्रवाह बंद झाला. परिणामी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होत होती. पाणी टंचाईच्या समस्येमुळे गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती.हे गाव जलसमृध्द करण्याचा संकल्प जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग गोंदियाचे उपविभागीय अभियंता रमेश चौधरी व शाखा अभियंता वासुदेव रामटेककर यांनी गावकºयांच्या सहकार्याने केला. परिसरातील सर्व नैसर्गिक प्रवाहाचे सर्वेक्षण केले.यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता पथाडे, अभियंता विश्वकर्मा यांनी देखील सहकार्य केले. गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या नवीन तलावाचे, तलाव भरल्यावर सलंगापासून नाल्यास वाहणारे अधिकचे प्रवाह मोडून गावातील तलावात आणल्यास गावास जलयुक्त बनविता येईल, त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल. असे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर त्या दृष्टीने कामास सुरूवात करण्यात आली. यासाठी एकूण ७०० मीटर लांब फीडर चॅनल प्रस्तावित करण्यात आले.सदर कामावर १९.५७ लाख रूपये अंदाजे खर्च लागणार होते. या कामात ५३५ मीटर लांबीचा खुला कालवा व १६५ मीटर लांब भूमिगत पाईप लाईनचा समावेश होता. प्रवाहास वळण देण्याकरिता तलावाच्या सलंगावर काँक्रिटची भिंत बांधण्यात आली. १७ लाख ४१ हजार रूपयांच्या खर्चात अतिशय अवघड प्रकाराचे हे काम ३ महिन्यातच पूर्ण करण्यात आले.१५ वर्षात प्रथमच भरला तलावयावर्षी सरासरी पेक्षाही बराच कमी पाऊस पडला. तरीही मागील २८ आॅगस्टला रात्री झालेल्या दमदार पावसामुळे नवीन तलाव पूर्ण भरून अधिकचे पाणी वळण होवून गावामधील तलावात भरणे सुरू झाले. त्यामुळे मागील १५ वर्षात कधी न भरलेल्या तलावात सध्या पूर्ण क्षमतेपर्यंत पाणी संग्रहीत झाले. तलावात पाणी साचल्याने भूजल पातळीत वाढ झाली असून पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली.लोकप्रतिनिधी आणि गावकºयांचे सहकार्यदत्तोरा येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामे करण्यासाठी आणि या गावाची अभियानात निवड करण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. माजी सरपंच धनलाल कावळे, सूरजलाल महारवाडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेंढे, मेघराज महारवाडे, दिनेश उके व गावकरी मंडळीने जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचे आभार व्यक्त केले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे मागील १५ वर्षांत कधीही न भरलेला तलाव यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही भरला. त्यामुळे दत्तोरा गाव जलयुक्त झाले व गावातील पाणी टंचाईचे कायमचे निर्मूलन झाले आहे.-रोशन पाथोडे,सरपंच, दतोरा.