शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दतोरा झाले जलसमृद्ध गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:01 IST

मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या समस्येवर मात : जि.प. लघु सिंचन विभागाचा उपक्रम

देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील अनेक वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देणारे दतोरा गाव यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत फीडर कॅनलच्या बांधकामामुळे जलसमृद्ध झाले आहे. त्यामुळे दरवर्षी निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या समस्येवर पूर्णपणे मात करण्यास यश आले आहे.सन २०१६-१७ च्या जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनात गोंदिया तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला होता. यात दतोरा गावाचा समावेश आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाच्या मध्यभागी असलेला माजी मालगुजारी तलाव ब्रिटिश काळापासून पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे.परंतु मागील १५ ते २० वर्षांत या तलावाच्या जलआवक क्षेत्रात निवासी क्षेत्र निर्माण झाल्याने व सिमेंट-काँक्रिटचे उंच रस्ते तयार केल्याने तलावात येणारा प्रवाह बंद झाला. परिणामी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होत होती. पाणी टंचाईच्या समस्येमुळे गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत होती.हे गाव जलसमृध्द करण्याचा संकल्प जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग गोंदियाचे उपविभागीय अभियंता रमेश चौधरी व शाखा अभियंता वासुदेव रामटेककर यांनी गावकºयांच्या सहकार्याने केला. परिसरातील सर्व नैसर्गिक प्रवाहाचे सर्वेक्षण केले.यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता पथाडे, अभियंता विश्वकर्मा यांनी देखील सहकार्य केले. गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या नवीन तलावाचे, तलाव भरल्यावर सलंगापासून नाल्यास वाहणारे अधिकचे प्रवाह मोडून गावातील तलावात आणल्यास गावास जलयुक्त बनविता येईल, त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल. असे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर त्या दृष्टीने कामास सुरूवात करण्यात आली. यासाठी एकूण ७०० मीटर लांब फीडर चॅनल प्रस्तावित करण्यात आले.सदर कामावर १९.५७ लाख रूपये अंदाजे खर्च लागणार होते. या कामात ५३५ मीटर लांबीचा खुला कालवा व १६५ मीटर लांब भूमिगत पाईप लाईनचा समावेश होता. प्रवाहास वळण देण्याकरिता तलावाच्या सलंगावर काँक्रिटची भिंत बांधण्यात आली. १७ लाख ४१ हजार रूपयांच्या खर्चात अतिशय अवघड प्रकाराचे हे काम ३ महिन्यातच पूर्ण करण्यात आले.१५ वर्षात प्रथमच भरला तलावयावर्षी सरासरी पेक्षाही बराच कमी पाऊस पडला. तरीही मागील २८ आॅगस्टला रात्री झालेल्या दमदार पावसामुळे नवीन तलाव पूर्ण भरून अधिकचे पाणी वळण होवून गावामधील तलावात भरणे सुरू झाले. त्यामुळे मागील १५ वर्षात कधी न भरलेल्या तलावात सध्या पूर्ण क्षमतेपर्यंत पाणी संग्रहीत झाले. तलावात पाणी साचल्याने भूजल पातळीत वाढ झाली असून पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली.लोकप्रतिनिधी आणि गावकºयांचे सहकार्यदत्तोरा येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामे करण्यासाठी आणि या गावाची अभियानात निवड करण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. माजी सरपंच धनलाल कावळे, सूरजलाल महारवाडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेंढे, मेघराज महारवाडे, दिनेश उके व गावकरी मंडळीने जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचे आभार व्यक्त केले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे मागील १५ वर्षांत कधीही न भरलेला तलाव यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही भरला. त्यामुळे दत्तोरा गाव जलयुक्त झाले व गावातील पाणी टंचाईचे कायमचे निर्मूलन झाले आहे.-रोशन पाथोडे,सरपंच, दतोरा.