शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

गोंदिया : सुखी संसाराच्या स्वप्नांना आता ग्रहण लागत आहे. मुलींकडील मंडळींची अपेक्षा मुलाकडून मोठ्या प्रमाणात असल्याने चांगल्या-चांगल्या मुलांना मुली ...

गोंदिया : सुखी संसाराच्या स्वप्नांना आता ग्रहण लागत आहे. मुलींकडील मंडळींची अपेक्षा मुलाकडून मोठ्या प्रमाणात असल्याने चांगल्या-चांगल्या मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे. शिकून मोठे झालेल्या मुलांच्या हातात नोकरी नसल्याने ते लग्न करू शकत नाही. नोकरी नाही तर छोकरी नाही अशी स्थीती गोंदिया जिल्ह्यात आहे. शेतकरी मुलाला मुलींची नापसंती आहे.

पोट भरण्यासाठी शेतीला व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकरी पोराला कुणीच विचारत नसल्याची खंत तरूण शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाली. डॉक्टर, नोकरपेशा यांना मोठ्या प्रमाणात पसंती आहे. त्यातही डॉक्टर एमबीबीएस असायला हवा असाच समज समाजात दृढ झाला आहे. व्यावसायिकाला ना पसंती ना नकार दिला जातो. परंतु शेतकरी मुलाला सरळ नकारच दिला जात आहे. त्यामुळे अनेक मुलांचे लग्न होत नाही. मुलींचा जन्मदर घटल्याने मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे.

.......

मुलींकडून ठेवल्या जातात अट

लग्नानंतरी नवऱ्याने सोबत ठेवायला हवे, नवरा शहराच्या ठिकाणी असावा, आईवडीलांपासून दूर असावा. नोकरीच्या ठिकाणी नवऱ्या मुलीला न्यावे, शिकण्याची इच्छा असेल तर शिकू द्यावे, नोकरी करण्याची इच्छा मुलीची झाली तर नोकरी करू देण्यास मुलगा तयार असावा अश्या विविध अटी मुलांकडे मुलींकडील मंडळी ठेवत आहेत.

........

सर्वाधिक मागणी एमबीबीएस डॉक्टरांना

१) मुलगा लग्नासाठी पाहात असताना मुलगा डॉक्टर असावा पण त्यातही तो एमबीबीएस डॉक्टर असावा अशी मुलीकडील मंडळींची अपेक्षा असते.

२) मुलगा नोकरीवर असावा, व्यसनी नसावा, शहाराच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास अधिक पसंती दर्शविली जाते. नोकरीसाठी बाहेर असलेल्या मुलासाठी वशीला लावला जातो. माझी मुलगी नोकरीदार मुलासोबतच सुखी राहू शकते ही आईवडीलांची धारणा झाली आहे.

३) छोटे कुटुंब असलेल्या मुलांनाही पसंती दिली जाते. संयुक्त कुटुंबातील नोकरीवर असलेल्या कुटुंबातील मुलांनाही मुली नाकारत आहेत.

...........

मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. ज्या मुलींचे शिक्षण १२ वी असेल त्या मुलीसाठीही वडील नोकरीवाला मुलगा असावा असे म्हणतो. आपल्या मुलीची योग्यता पाहून वर पाहायला हवे. परंतु मुलीची योग्यता न पाहता मुलाच्या योग्यतेकडे वधूपिता पाहात असल्याने समाजाचे समतोल ढासळत आहे.

- सखाराम मेंढे, वरपिता

...............

आपल्या मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवित असतांना त्या मुलासोबत आपल्या मुलीचा संसार सुखी राहील किंवा नाही याची शहानिशा करूनच स्थळ शोधणे गरजेचे आहे. अनेक मुल लग्न जोडण्यासाठी खोटी माहिती देऊन मुलींची फसवणूक करतात. लग्न जुळल्यानंतर काही दिवसात त्यांची वास्तविकता समोर आल्यास लग्न मोडले जाते.

- नारायण कारंजेकर, वधूपिता

........

आजच्या मुलामुलींमध्ये संयम नसल्यामुळे लग्नानंतरही ते कुटुंब चालवू शकतील किंवा नाही हे निश्चीत राहात नाही. दोन्ही पक्ष एकमेकाला समजून घेत नसल्यामुळे अनेक लग्न मोडतात. त्यात लग्न जोडणाऱ्यांनाच दोष दिला जातो त्यामुळे लग्न जोडण्यास कुणी पुढाकार घेत नाही.

- लक्ष्मण काटेखाये, पदमपूर

........

- मुला-मुलीतील गुणसूत्र जुळविण्यापेक्षा त्यांचे मन जुळले पाहिजेत यासाठी आज प्रयत्न करावे लागतात. नुसते नोकरीपेशाकडेच मुलीकडील मंडळींचा कल असणे योग्य नाही. मग ज्यांना नोकरी नाही त्यांनी अविवाहित राहावे काय? तडजोड करून संसार चालवण्यात गोडी असते.

- सुनिल तरोणे, सावरटोला अर्जुनी-मोरगाव

......

मुलामुलींची लग्न जोडण्यात खूप कसरत होत आहे. एखाद्याचे लग्न जुळले आणि ते काही कारणास्तव ते मोडण्यावर आले त्यावेळी सर्व खापर लग्न जोडणाऱ्यावर फोडले जाते. परंतु ज्यांचे वैवाहिक जीवन सुखमय चालत आहे ती जोडपी त्या लग्न जोडणाऱ्याचे नावही काढत नाही. भांडण झाल्यास लग्न जोडणाऱ्यांवर हुंडाबंदी कायद्यात अडकण्याची भिती व्यकञत होत असल्याने कुणी मधात पडायला पाहात नाही.

-भरत चुटे, आमगाव

.....