शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

डोंगरगाववासीय पीत आहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:51 IST

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना बंद : गावकºयांचे आरोग्य धोक्यात

हितेंद्र जांभुळकर ।ऑनलाईन लोकमतसुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. मात्र बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव-खडकी या गावाला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. गावकºयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. त्यामुळे गावकºयांना सुध्दा शुध्द पाणी पिण्यास मिळेल अशी अपेक्षा होती. डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना ही तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना आहे.पण या योजनेला मागील वर्षभरापासून ग्रहण लागले आहे. त्यामुळे ही योजना कधी बंद तर कधी सुरू असते. पाच वर्षांपूर्वी डोंगरगाव आणि खडकी हे दोन्ही गावे एकत्र असल्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने वाढीव पाणी पुरवठा योजनेत या दोन्ही गावांचा समावेश केला. याच योजनेतंर्गत गावकºयांना पाणी पुरवठा सुरू होता. मात्र मागील महिनाभरापासून थकीत वीज देयकामुळे पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे या योजनेव्दारा पाणी पुरवठा बंद असल्याने गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने विहिरी व बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे.गावातील महिला पाण्यासाठी १ ते २ कि.मी.भटकंती करुन पाणी आणत आहेत. मात्र ते पाणी देखील गढूळ असल्याने गावकºयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातील नवजात मुले, स्तनदा माता, गरोदर माता, लहान मुले यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी टंचाई उपाय योजना कागदावरमार्च महिन्याला सुरूवात झाली असली तरी जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात आल्या नाही. जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरुस्त आहेत. तर अनेक बोअरवेलेच पाईप खराब झाले असून ते बदलण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे कुठलीच पाऊले उचलण्यात आली नाही. एकंदरीत पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशाराडोंगरगाव-खडकी येथील बंद असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत सुरु करा. तसेच गावातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील गावकºयांनी दिला आहे.अहवालाकडे दुर्लक्षजिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात देखील अल्प पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची स्थिती गंभीर राहणार असल्याची शक्यता वर्तविली होती. तसा अहवाल देखील प्रशासनाला दिला. त्यामध्ये तिरोडा तालुक्याला पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसण्याचा अंदाज वर्तविला होता. तसा अहवाल सुध्दा जिल्हा प्रशासनाकडे सोपविला होता. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.