शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

डोंगरगाववासीय पीत आहेत गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:51 IST

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा योजना बंद : गावकºयांचे आरोग्य धोक्यात

हितेंद्र जांभुळकर ।ऑनलाईन लोकमतसुकडी/डाकराम : तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. मात्र बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव-खडकी या गावाला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. गावकºयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. त्यामुळे गावकºयांना सुध्दा शुध्द पाणी पिण्यास मिळेल अशी अपेक्षा होती. डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना ही तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना आहे.पण या योजनेला मागील वर्षभरापासून ग्रहण लागले आहे. त्यामुळे ही योजना कधी बंद तर कधी सुरू असते. पाच वर्षांपूर्वी डोंगरगाव आणि खडकी हे दोन्ही गावे एकत्र असल्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने वाढीव पाणी पुरवठा योजनेत या दोन्ही गावांचा समावेश केला. याच योजनेतंर्गत गावकºयांना पाणी पुरवठा सुरू होता. मात्र मागील महिनाभरापासून थकीत वीज देयकामुळे पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे या योजनेव्दारा पाणी पुरवठा बंद असल्याने गावकºयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने विहिरी व बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे.गावातील महिला पाण्यासाठी १ ते २ कि.मी.भटकंती करुन पाणी आणत आहेत. मात्र ते पाणी देखील गढूळ असल्याने गावकºयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातील नवजात मुले, स्तनदा माता, गरोदर माता, लहान मुले यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी टंचाई उपाय योजना कागदावरमार्च महिन्याला सुरूवात झाली असली तरी जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात आल्या नाही. जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरुस्त आहेत. तर अनेक बोअरवेलेच पाईप खराब झाले असून ते बदलण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे कुठलीच पाऊले उचलण्यात आली नाही. एकंदरीत पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावर असल्याचे चित्र आहे.गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशाराडोंगरगाव-खडकी येथील बंद असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत सुरु करा. तसेच गावातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील गावकºयांनी दिला आहे.अहवालाकडे दुर्लक्षजिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात देखील अल्प पाणीसाठा आहे. परिणामी जिल्ह्यातील भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची स्थिती गंभीर राहणार असल्याची शक्यता वर्तविली होती. तसा अहवाल देखील प्रशासनाला दिला. त्यामध्ये तिरोडा तालुक्याला पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसण्याचा अंदाज वर्तविला होता. तसा अहवाल सुध्दा जिल्हा प्रशासनाकडे सोपविला होता. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.