शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:06 IST

गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात जैवविविधता व वन्यजीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे. अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे सुध्दा आहे.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : सभेत घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात जैवविविधता व वन्यजीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे. अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे सुध्दा आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) जिल्ह्याातील पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करावे, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.५ ते २५ आॅक्टोबर दरम्यान राज्यातील पर्यटनस्थळांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने उपवनसंरक्षक एस. युवराज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, सोनाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी. नौकरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, निसर्गप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, एस.टी. आगार प्रमुख जयकुमार इंगोले, कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे, एमटीडीसीचे झंझाड, शुभम अग्रवाल,अशोक मंत्री, सुरेश चौधरी, हितेश सव्वालाखे उपस्थित होते.काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यात वाघ, बिबट, काळे काळविट, विविध प्रजातीचे पक्षी व नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे. १०० वर्षांपेक्षा जुनी महालासारखी असलेली घरे पर्यटकांना होम स्टेच्या दृष्टीने कशी उपयोगात आणता येईल, यादृष्टीने एमटीडीसीने नियोजन करावे. होम स्टे पर्यटनाला प्राधान्य द्याावे,असे त्यांनी सांगितले.हेडे म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रचार-प्रसिध्दीचे काम करते. पर्यटन पर्वाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध पर्यटन व तीर्थक्षेत्राला पर्यटकांनी भेट द्यावी. जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांना जिल्ह्यातील नागरिकांनी सुध्दा भेट द्यावी. डॉ. जैन यांनी पर्यावरण रक्षणासाठी सायकल टुरिझमची आवश्यकता विषद केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट दिल्यास स्थानिकांना रोजगार निर्मितीस मदत होणार असल्याचे सांगितले.