शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाचा बिहार करू नका...

By admin | Updated: April 20, 2016 01:57 IST

गेल्या १० दिवसात गोंदिया शहरातील दोन मोठ्या घटना आणि त्याचे पडलेले पडसाद, त्यातून निर्माण झालेला तणाव,....

मनोज ताजने गोंदियागेल्या १० दिवसात गोंदिया शहरातील दोन मोठ्या घटना आणि त्याचे पडलेले पडसाद, त्यातून निर्माण झालेला तणाव, भीती हे पाहिल्यानंतर आपण महाराष्ट्रात आहो की बिहारमध्ये? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. राज्यातील एका वरिष्ठ आमदाराला सर्वांसमक्ष होणारी मारहाण असो की पोलिसांच्या सुरक्षेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नगरसेवकावर गोळीबार करून आरोपींचे सहजपणे पळून जाणे असो, शहरातील कायदा व सुव्यवस्था पोलिसांच्या अवाक्यात राहिली नाही, हेच या घटनाक्रमांवरून दिसून येत आहे.महाराष्ट्रात समाविष्ठ होऊन गोंदियाला ५६ वर्षे झाली असली तरी गोंदिया शहरावर छत्तीसगड-मध्यप्रदेशच्या संस्कृतीचा पगडा अजूनही कायम असल्याचे वेळोवेळी दिसून येते. पण राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्राची आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशीच त्यांची पकड असावी अशी रास्त अपेक्षा आहे. पण शहरातील या घटना पाहता पोलीस यंत्रणेची पकड ढिली झाली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गेल्या ९ तारखेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. राजकारणात राग व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात तरी अशा पद्धतीने एखाद्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करणे, कपडे फाडणे, शिविगाळ करणे शोभणारे नाही. आधी मारहाणीचे वृत्त ऐकून कानावर विश्वास न ठेवणाऱ्यांनी नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपिंग्जमधून ही मारहाण पाहिली. त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरात बंद पुकारला. आजही या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर आहेत.या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी न.प.उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर पोलिसांसमक्ष गोळीबार करून आरोपी निघून गेले. यात यादव थोडक्यात बचावले. ईमलाह हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे चार-चार पोलिसांच्या पहाऱ्यात असलेल्या यादव यांच्यावर गोळीबार करण्याची हिंमत एखाद्याने करावी, हे आरोपी शिरजोर झाल्याचे द्योतक आहे, की पोलीस कमजोर झाल्याचे, हे त्यांचे त्यांनीच ठरवले पाहीजे. काहीही असले तरी शहरातील हे बिघडत चाललेले वातावरण नागरिकांच्या दृष्टीने असुरक्षित झाले आहे. भांडण, हल्ले हे कोणावरही झाले तरी त्याचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो. बंद पाळण्याच्या निमित्ताने होणारी गैरसोय, प्रसंगी त्यासाठी होणारा बळाचा वापर यामुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली जाते. शाळकरी कोवळ्या मुलांवर चांगल्या गोष्टीचे संस्कार पडण्याऐवजी गँगवार कसे झाले, त्यामुळे शाळेला सुटी कशी मिळाली हे ऐकण्याची वेळ येते तेव्हा याचे दुरगामी परिणाम नजरेसमोर दिसू लागतात.पंकज यादववरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या तीन अवघ्या १९-२० वर्षाच्या पोरांना अटक केली. यातील एक तर अल्पवयीन आहे. प्रत्यक्ष गोळी चालविणारा वेगळाच असला तरी या पोरांचाही त्यात हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. असेलही कदाचित, पण ते तर मोहरे आहेत. हा हल्ला कोणी करवून घेतला त्याचाही शोध पोलिसांनी लवकर घेतला पाहीजे. पोलिसांनी आताही जर कडक पावले उचलली नाही तर हे वातावरण आणखी बिघडत जाणार आणि परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. गोंदियाचे बिहार होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या एसी केबिनच्या बाहेर पडून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, एवढीच गोंदियावासीयांची अपेक्षा आहे.