शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियाचा बिहार करू नका...

By admin | Updated: April 20, 2016 01:57 IST

गेल्या १० दिवसात गोंदिया शहरातील दोन मोठ्या घटना आणि त्याचे पडलेले पडसाद, त्यातून निर्माण झालेला तणाव,....

मनोज ताजने गोंदियागेल्या १० दिवसात गोंदिया शहरातील दोन मोठ्या घटना आणि त्याचे पडलेले पडसाद, त्यातून निर्माण झालेला तणाव, भीती हे पाहिल्यानंतर आपण महाराष्ट्रात आहो की बिहारमध्ये? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. राज्यातील एका वरिष्ठ आमदाराला सर्वांसमक्ष होणारी मारहाण असो की पोलिसांच्या सुरक्षेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नगरसेवकावर गोळीबार करून आरोपींचे सहजपणे पळून जाणे असो, शहरातील कायदा व सुव्यवस्था पोलिसांच्या अवाक्यात राहिली नाही, हेच या घटनाक्रमांवरून दिसून येत आहे.महाराष्ट्रात समाविष्ठ होऊन गोंदियाला ५६ वर्षे झाली असली तरी गोंदिया शहरावर छत्तीसगड-मध्यप्रदेशच्या संस्कृतीचा पगडा अजूनही कायम असल्याचे वेळोवेळी दिसून येते. पण राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्राची आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशीच त्यांची पकड असावी अशी रास्त अपेक्षा आहे. पण शहरातील या घटना पाहता पोलीस यंत्रणेची पकड ढिली झाली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गेल्या ९ तारखेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. राजकारणात राग व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात तरी अशा पद्धतीने एखाद्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करणे, कपडे फाडणे, शिविगाळ करणे शोभणारे नाही. आधी मारहाणीचे वृत्त ऐकून कानावर विश्वास न ठेवणाऱ्यांनी नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपिंग्जमधून ही मारहाण पाहिली. त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरात बंद पुकारला. आजही या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर आहेत.या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी न.प.उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर पोलिसांसमक्ष गोळीबार करून आरोपी निघून गेले. यात यादव थोडक्यात बचावले. ईमलाह हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे चार-चार पोलिसांच्या पहाऱ्यात असलेल्या यादव यांच्यावर गोळीबार करण्याची हिंमत एखाद्याने करावी, हे आरोपी शिरजोर झाल्याचे द्योतक आहे, की पोलीस कमजोर झाल्याचे, हे त्यांचे त्यांनीच ठरवले पाहीजे. काहीही असले तरी शहरातील हे बिघडत चाललेले वातावरण नागरिकांच्या दृष्टीने असुरक्षित झाले आहे. भांडण, हल्ले हे कोणावरही झाले तरी त्याचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो. बंद पाळण्याच्या निमित्ताने होणारी गैरसोय, प्रसंगी त्यासाठी होणारा बळाचा वापर यामुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली जाते. शाळकरी कोवळ्या मुलांवर चांगल्या गोष्टीचे संस्कार पडण्याऐवजी गँगवार कसे झाले, त्यामुळे शाळेला सुटी कशी मिळाली हे ऐकण्याची वेळ येते तेव्हा याचे दुरगामी परिणाम नजरेसमोर दिसू लागतात.पंकज यादववरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या तीन अवघ्या १९-२० वर्षाच्या पोरांना अटक केली. यातील एक तर अल्पवयीन आहे. प्रत्यक्ष गोळी चालविणारा वेगळाच असला तरी या पोरांचाही त्यात हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. असेलही कदाचित, पण ते तर मोहरे आहेत. हा हल्ला कोणी करवून घेतला त्याचाही शोध पोलिसांनी लवकर घेतला पाहीजे. पोलिसांनी आताही जर कडक पावले उचलली नाही तर हे वातावरण आणखी बिघडत जाणार आणि परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. गोंदियाचे बिहार होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या एसी केबिनच्या बाहेर पडून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, एवढीच गोंदियावासीयांची अपेक्षा आहे.