शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:12 IST

स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनुसुचित जाती व अनुसूचित जमती या प्रवर्गावर अन्याय आणि अत्याचार होऊ नये म्हणून संविधानातील अ‍ॅट्रासिटी कायदा अंमलात आणला.

ठळक मुद्देसरपंच- उपसरपंचांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

ऑनलाईन लोकमतदेवरी : स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनुसुचित जाती व अनुसूचित जमती या प्रवर्गावर अन्याय आणि अत्याचार होऊ नये म्हणून संविधानातील अ‍ॅट्रासिटी कायदा अंमलात आणला. परंतु सदर जातीतील लोकांना समान अधिकार अजूनपर्यंत मिळालेले नसून आता अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शासनाला दिले. त्यामुळे या कायदयात फेरबदल करु नये अशी मागणी तालुक्यातील सरपंच व उपसरपंचांनी केली असून सोमवारी (दि.२६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांच्या मार्फत पाठविण्यात आले.निवेदनातून, मागासवर्गीय लोकांना समान अधिकार मिळावे म्हणून केंद्रातील मागील युपीए सरकार व राज्यातील युती सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायदा अंमलात आणून मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न केला. परंतु वर्तमान सरकारला अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथील करण्यास भारतीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले. हे पूर्णपणे असंवैधानिक आहे. या निर्णयामुळे पुन्हा मागासवर्गीय समाजावर अन्याय आणि अत्याचार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता या कायद्याला शिथील व फेरबदल करु नये अशी मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन सोमवारी (दि.२६) जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील महिला-पुरुष सरपंच व उपसरपंचांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रभारी उपविभागीय अधिकारी बोरूडे यांच्यामार्फत पाठविण्यात आले. या शिष्टमंडळात सेडपारच्या सरपंच माधुरी राऊत, चिचेवाडाच्या सरपंच श्यामकला गावळ, पिंडकेपारच्या सरपंच प्रमिला घासले, पिंडकेपार-चिचगडच्या सरपंच ज्योती धानगाये, गडेगावच्या सरपंच अनिता वालदे, आलेवाडाच्या सरपंच गीता घासले, कन्हाळगावच्या सरपंच कौशल्या राऊत, पुराडाचे सरपंच रमेश साखरे, पलानगावचे सरपंच संजय राऊत, चिचगडच्या सरपंच कल्पना गोसावी, पालांदूर जमीचे उपसरपंच नुरचंद नाईक, पळसगावचे उपसरपंच उत्तम धानगाये यांच्यासह मोठ्या संख्येत सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.