शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या

By admin | Updated: September 12, 2016 00:21 IST

अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे.

खोडशिवणीचे नागरिक रस्त्यावर: २५ गावांतील लोकांची मागणीसडक-अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. या कामाला नागरिकांनी तिव्र विरोध केला आहे. या ठिकाणी मानव रहित गेट तयार करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून सदर बांधकामाच्या ठिकाणी अंतर्गत रस्ता किंवा मानव रहित गेट तयार करावी याकरीता चौकशी सुरू आहे. यापूर्वी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी देवरी यांनी रेल्वे प्रशासनासोबत भेट दिली. यावेळी परिसरातील सरपंच, पोलीस पाटलासह लोकांनी भूमीगत पूल (बोगदा) बांधकास विरोध दर्शवून तसेच ठराव सुध्दा कनिष्ठ अभियंता रेल्वे विभाग नागभीड यांना पाठविला आहे. सदर रस्ता साकोली-सडक-अर्जुनी या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्याने २५ गावातील जड वाहने हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. सदर ठिकाणी बोगद्याचे बांधकाम केल्यास नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होत नाही. कारण सदर बांधकामाची व रेल्वे स्टेशनला जाण्याकरीता पर्यायी रस्ता राहणार नाही. जागा समांतर पातळीवर आहे व ती तांत्रीक दृष्ट्या बोगदा बांधकामास अयोग्य आहे. बोगदा बांधकाम केल्यास ट्रक, ट्रॅक्टर व बस सारखे वाहनांच्या रहदारीवर परिणाम होईल. हा बोगदा परिसरातील नागरिकांना कायमचे डोकेदुखी ठरेल. रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याची योजना रेल्वे विभागाची असले तरी बोगदा बांधकामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. रेल्वे विभागाने यापूर्वी कमी वर्दळीच्या ठिकाणी सौंदड, गोंडउमरी, पांढरी रस्ता, नागझिरा रोड येथे मानव रहित गेट तयार केले आहेत. याच ठिकाणी बोगदा बांधकामाचा आग्रह का केला जातो. गोंदिया-चंद्रपूर मार्गावर अनेक ठिकाणी बोगदे बांधले आहेत. तिथे पाणी साचल्यामुळे जाणे-येणे बंद आहे. त्यामुळे बोगदा बांधकामातील पैशाच्या लाभाचा विचार अधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी रेल्वे विभागाने आठ ते दहा वेळा सर्व्हेक्षण करून नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होणार नाही असा रिपोर्ट दिला आहे. यापूर्वीच सदर रस्त्याच्या बाजूच्या दोन्ही गेट रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत. त्यामुळे रहदाराची कायम समस्या निर्माण करणारा बोगदा तयार करू नये, जबरदस्तीने बोगदा बांधकाम केल्यास या परिसरातील नागरिक आंदोलन करतील याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे विभागावर राहील. (शहर प्रतिनिधी)