शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या

By admin | Updated: September 12, 2016 00:21 IST

अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे.

खोडशिवणीचे नागरिक रस्त्यावर: २५ गावांतील लोकांची मागणीसडक-अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. या कामाला नागरिकांनी तिव्र विरोध केला आहे. या ठिकाणी मानव रहित गेट तयार करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून सदर बांधकामाच्या ठिकाणी अंतर्गत रस्ता किंवा मानव रहित गेट तयार करावी याकरीता चौकशी सुरू आहे. यापूर्वी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी देवरी यांनी रेल्वे प्रशासनासोबत भेट दिली. यावेळी परिसरातील सरपंच, पोलीस पाटलासह लोकांनी भूमीगत पूल (बोगदा) बांधकास विरोध दर्शवून तसेच ठराव सुध्दा कनिष्ठ अभियंता रेल्वे विभाग नागभीड यांना पाठविला आहे. सदर रस्ता साकोली-सडक-अर्जुनी या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्याने २५ गावातील जड वाहने हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. सदर ठिकाणी बोगद्याचे बांधकाम केल्यास नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होत नाही. कारण सदर बांधकामाची व रेल्वे स्टेशनला जाण्याकरीता पर्यायी रस्ता राहणार नाही. जागा समांतर पातळीवर आहे व ती तांत्रीक दृष्ट्या बोगदा बांधकामास अयोग्य आहे. बोगदा बांधकाम केल्यास ट्रक, ट्रॅक्टर व बस सारखे वाहनांच्या रहदारीवर परिणाम होईल. हा बोगदा परिसरातील नागरिकांना कायमचे डोकेदुखी ठरेल. रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याची योजना रेल्वे विभागाची असले तरी बोगदा बांधकामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. रेल्वे विभागाने यापूर्वी कमी वर्दळीच्या ठिकाणी सौंदड, गोंडउमरी, पांढरी रस्ता, नागझिरा रोड येथे मानव रहित गेट तयार केले आहेत. याच ठिकाणी बोगदा बांधकामाचा आग्रह का केला जातो. गोंदिया-चंद्रपूर मार्गावर अनेक ठिकाणी बोगदे बांधले आहेत. तिथे पाणी साचल्यामुळे जाणे-येणे बंद आहे. त्यामुळे बोगदा बांधकामातील पैशाच्या लाभाचा विचार अधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी रेल्वे विभागाने आठ ते दहा वेळा सर्व्हेक्षण करून नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होणार नाही असा रिपोर्ट दिला आहे. यापूर्वीच सदर रस्त्याच्या बाजूच्या दोन्ही गेट रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत. त्यामुळे रहदाराची कायम समस्या निर्माण करणारा बोगदा तयार करू नये, जबरदस्तीने बोगदा बांधकाम केल्यास या परिसरातील नागरिक आंदोलन करतील याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे विभागावर राहील. (शहर प्रतिनिधी)