शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:51 IST

राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भजेपार येथे भगवान बिरसामुंडा पुतळ््याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राज्य सरकारने आदिवासींच्या विकासात अडसर निर्माण करुन डी.बी.टी. सारख्या योजना लादून आदिवासी तरुण-तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यांना वाम मार्गाकडे वळणारे हे फसवे धोरण आहे. वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेणारी सरकारची ही कार्यप्रणाली आदिवासींच्या जिवनाशी खेळण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेने सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्वास ठेवू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम भजेपार येथील क्रांतीसूर्य भगवान बिरसामुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शुक्रवारी (दि.२५) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालयाचे प्राचार्य एस.बी. राऊत होते. दिप प्रज्वलन जि.प. सदस्य सुनित मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झेड.जे. भोयर, भिवराम विद्यालयाचे प्राचार्य अशोक पटले, आदर्श शिक्षक जी.एन. बिसेन, आर.के. किरसान, व्ही.आर. खोब्रागडे, यू.एल. टेंभरे, आर.सी. कटरे, मूर्तिकार राधेशाम नागपुरे, आदिवासी नॅशनल पिपल्स फेडरेशन समितीचे अध्यक्ष वसंत मडावी, माजी उपसभापती धानसिंग बघेले, डॉ. तारेंद्र बिसेन उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, आदिवासी समाजाने अंधश्रद्धा कमी करुन शिक्षणाकडे वळले पाहिजे, जेणे करुन समाजाचा विकास होईल. शिक्षण घेवून फक्त नोकरी करणे म्हणजे समाजाचा विकास नव्हे. एक नोकरदार फक्त बायका पोरांना शिक्षण देवू शकतो. पण एक उद्योजक अनेक लोकांना रोजगार देवून खºया दृष्टीने समाज विकास साधू शकतो. म्हणून सदर जबाबदारी स्वत:वर घ्या आणि उद्योगाकडे वळा असा सल्ला नवतरुणांना दिला. प्राचार्य पटले यांनी, समाजातील सांस्कृतिक वारसा कशाप्रकारे जतन करुन ठेवावा याबद्दल मार्गदर्शन केले. तर मूर्तिकार राधेशाम नागपुरे व इतर वक्तयांनी सुद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमानिमित्त सकाळी सद्भावना रॅली काढण्यात आली व त्यानंतर रात्री समाज प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संचालन रामकुमार कोसने यांनी केले. आभार किसन मडावी यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाकचंद मानकर, अरुण देवगडे, लक्ष्मण घरत, धनराज किरसान, प्रभूपाल गधवार, शालीकराम कुंभरे, ललीता पंधरे, भाकचंद कोडवते, देवचंद टेकाम, आनंदराव कोळवते, दिलीप कोळवते, प्रेमलाल धुर्वे, उषा टेकाम, धुरपता किरसान यांच्यासह भजेपार परिसरातील सर्व आदिवासीबांधवांनी सहकार्य केले.