शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आपल्याला स्वराज्य मोफत मिळाल्यासारखे वागू नका

By admin | Updated: August 24, 2014 00:05 IST

गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य

बबनराव वानखेडे : क्रांतियोत यात्रेत मार्गदर्शनआमगाव : गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक महापुरुषांना शासन तर विसरले आपणही विसरून स्वराज्य मोफत मिळाल्यासारखे वागत असल्याची खंत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचारप्रमुख बबनराव वानखेडे यांनी व्यक्त केली. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीतर्फे आयोजित क्रांतिज्योत यात्रा प्रसंगी पद्मपूर येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्याला स्वराज्य मिळवून ६० वर्षाचा काळ लोटला परंतु ज्यांनी या स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचे नाव राष्ट्र पुरुषांच्या यादीत नाही. ही खेदाची बाब आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशात क्रांतीकारी घडविणारे भजने गायली त्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना जेलमध्ये पाठविले. नागपूर व रायपूर या दोन जेलमध्ये राष्ट्रसंतांना चार महिने काढावे लागले. स्वराज्य मिळवून दिल्यानंतर सुराज्य कसे स्थापन होईल यासाठी आपला देह झिजविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव शासनाच्या यादीत स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांमध्ये नाही. केंद्र व भारत सरकारने दखल घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत देण्याची मागणी करीत ही क्रांतीज्योत यात्रा जनजागृती करण्यासाठी काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री गुरुदेव सेवामंडळाचे केंद्रीय प्रचार सचिव दामोदर पाटील, विभागीय प्रचारक भानूदास कराडे, आजीवन प्रचारक टोंगे महाराज यवतमाळ, जिल्हा सेवाधिकारी एम.ए. ठाकूर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे शंकर वारंगे, अशोक चुटे, पुनाराम भांडारकर, ग्यानीराम ठाकरे, ललीत भांडारकर, नरेश रहिले, गंगा हुकरे, यशोदा रहिले, गीता शेंडे, जगदीश चुटे, भागरता भांडारकर, फागुलाल डुंबरकांबळे, शांता बागळे, कमला हुकरे व गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या क्रांतिज्योत यात्रेचे स्वागत पद्मपूर गुरुदेव सेवामंडळाच्या सदस्यांनी केले. यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी हुतात्मा ठरलेल्या शहिदांना व महापुरुषांना दोन मिनिटे मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ही यात्रा पुढच्या जनजागृतीसाठी रवाना झाली. (शहर प्रतिनिधी)