शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘लॉ अ‍ॅन्ड आॅर्डर’चा प्रश्न निर्माण होईल असे वागू नका

By admin | Updated: October 1, 2014 23:25 IST

नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारींची दखल घेतली जाईल. त्यासाठी गोळा करणारे कागदपत्र यासाठी पोलिसांना काही वेळ लागतोच. अशा स्थितीत नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये,

पो.अधीक्षक मीना : निवडणुकीसाठी पुरेसा बंदोबस्तनरेश रहिले - गोंदियानागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारींची दखल घेतली जाईल. त्यासाठी गोळा करणारे कागदपत्र यासाठी पोलिसांना काही वेळ लागतोच. अशा स्थितीत नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, तसेच पोलिसांनी हा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती उत्पन्न करू नये, अशी भावना नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केली.समाजात घडलेल्या बहुतांश घटनांची चौकशी सुरूच असताना नागरिकांना पोलिसांनी ते प्रकरण दडपले असावे असेच वाटते. परंतु अनेक प्रकरणांचा तपास करताना अडथळे येतात. आलेल्या तक्रारी खऱ्या आहेत किंवा नाही याचे पुरावे गोळा करण्यासाठी वेळ निघून जातो. यातून लोकांकडून पोलीसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप केला जातो. याचा फायदा काही समाजकंटक घेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. राजस्थानमधील वास्तव्यास असलेले शशीकुमार मिना सन २००९ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सन २००९ ते ११ पर्यंत सरदार वल्लभभाई पटेल प्रशिक्षण केंद्र हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे परिवेक्षाधिन पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले. तेथे दीड वर्ष काढल्यानंतर मार्च २०१३ मध्ये त्यांना पदोन्नतीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नक्षल अभियान गडचिरोली येथे नियुक्ती देण्यात आली. या ठिकाणीही त्यांनी सप्टेंबर २०१४ पर्यंत म्हणजेच दीड वर्ष काढले. त्यानंतर आचार संहिता लागण्यापूर्वी त्यांनी गोंदिया जिल्ह्याची पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे सांभाळली. ते रूजू होताच निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागल्याने बैठका, पत्रपरिषद आणि लागणारी फोर्स यासंदर्भात ते गुंतून राहिले. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६ पैकी ६ पोलीस ठाणे व ८ एओपी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत. सोबतच मध्यप्रदेशच्या बालाघाट, छत्तीसगडचा राजनांदगाव व महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा गोंदिया जिल्ह्याला लागून असल्याने नक्षलवाद्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात दिसून येते. या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी मोठी फोर्स मागविली आहे. इट का जवाब पत्थरसे देंगे. असे त्यांचे मत आहे. यासाठी निमलष्करी दलाच्या मोठ्या प्रमाणात कंपन्या, बटालियन व इतर जिल्ह्यातूनही पोलीस फोर्स मागविण्यात आले आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारींना आपली पोलीस न्याय देईल, कुणावरही अन्याय होणार नाही, कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवू नये यासाठी आपण जातीचे लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांंनी केले आहे.