शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:59 IST

तालुक्यात धानपिकांवरील कीडरोगांमुळे व परतीच्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देधानपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई व पीक विम्याची रक्कम देण्यात यावी.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात धानपिकांवरील कीडरोगांमुळे व परतीच्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धानपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई व पीक विम्याची रक्कम देण्यात यावी. अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाºयांच्या नावे दिलेल्या निवेदनातून केली आहे.माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नेतृत्वात राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सरपंच, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.कमी पावसामुळे अनेक शेतकºयांची शेतजमीन पडीक राहिली. ज्याठिकाणी रोवणी झाली, त्याठिकाणी तोंडाशी आलेला धान परतीच्या वादळी पावसाने हिरावून घेतला. धानाचे लोंब अंकुरित झाले. कीडरोग व तुडतुड्यामुळे धानाची तणस झाली. महागडी कीटकनाशके फवारणी करुन सुध्दा कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हताश झाल्याचे चित्र आहे. निसर्गाचा प्रकोप व रोगाचे आक्रमण झाल्यावरही पिकविमा कंपनीचे कर्मचारी, अधिकारी यांनी याची साधी दखलही घेतलेली नाही. सध्या धान कापणी सुरु झाली असली तरी कुणीही पंचनामे करण्यासाठी बांधावर पोहोचले नाही. धानावरील कीडरोगांमुळे शेतकºयांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. जनावरांच्या चाºयाचे संकट सुध्दा शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकºयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकºयांच्या सहनशक्तीचा अधिक अंत न पाहता संबंधित यंत्रणेमार्फत प्रत्येक गावातील शेतकºयांच्या शेताची संयुक्त पाहणी करावी. तातडीने पंचनामे करावे व सरसकट ३० हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी. तसेच पिक विमा मिळण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, सुकराम फुंडे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, टिकाराम मेंढे, प्रमोद शिवणकर, मुक्तानंद पटले, रवी क्षीरसागर, संजय रावत, मुलचंद बघेले, कविता रहांगडाले, घनश्याम मेंढे, ललीता परतेती, किशन मेंढे, गोविंद शेंडे, ताराचंद काटेखाये, नामदेव दोनोडे, लखन भलावी, नरेंद्र शिवणकर, सोनवाने, बळीराम फुंडे, उमेदलाल कटरे, शोभेंद्र मेंढे, चैतराम पटले यांचा समावेश होता.