शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

दिव्यांग हा समाजाचा घटक आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:40 IST

दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्युनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : दिव्यांगांना साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्युनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी गोंदिया परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृउबा समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.च्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाणे, रघूनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, केवलराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, होमराज ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे उपस्थित होते.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा महाराष्टÑ शासनाचा पहिला महत्वकांक्षी प्रकल्पाची गोंदियातून सुरुवात झाली आहे.हा प्रकल्प राज्यभर राबविला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात उपकरणे वितरण शिबिर आयोजित केले असून याद्वारे २३०० दिव्यांगांना तीन चाकी सायकल, कुबडी, श्रवणयंत्र, काठी, स्मार्टफोन यासारखी उपकरणे मोफत दिली जात आहेत.यासाठी १ कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. शासनातर्फे १३ दिव्यांग खेळाडूंना नोकरी देण्यात आली. यासारख्या त्यांच्या हिताच्या विविध योजना शासन राबवित आहे. शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. या क्षेत्रात इमारती, वर्गखोल्या, शिक्षकांची उणीव आहे. शिक्षक मुख्यालयात राहात नाही. अशा अनेक तक्रारी आहेत.साथीचे आजाराची लागण या दिवसात होते. दिवयांगांचे शिक्षक आपले कर्तव्य चोख बजावत आहेत किंवा नाही. याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनेक शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत. याकडे महसूल व सहकार विभागाने लक्ष द्यावे. वनजमिनीवरील अतिक्रमणाचे पट्टे देण्याचे निर्देश देवून ८ दिवसात हे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर बोरकर, प्रास्ताविक मिलिंद रामटेके यांनी केले. खंडविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांनी मानले.अनुदान राशी ५ टक्केग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती यासारख्या विविध कार्यालयांना शासनाकडून मिळणाºया निधीपैकी ३ टक्के खर्च दिव्यांगांसाठी केला जात होता. यापुढे ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च केला जाणार आहे.