शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सा.बां.विभागाच्या कारभाराने पंधरवाड्यात तीन अपघात

By admin | Updated: October 16, 2014 23:27 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील

वामन लांजेवार - शेंडा कोयलारीसडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तींना अपंगत्व वाट्याला आले असून वाटसरूंनी संताप व्यक्त केला आहे. सडक/अर्जुनीवरून तीन किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा (मुनिश्वर टोला) जवळ जीवघेणे वळण असून रस्त्यांच्या दोन्ही कडेला जंगल, झुडपे व उंच गवत वाढलेले आहे. त्यामुळे आमोरसमोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत नऊ तर एकाच पंधरवाड्यात तीन मोठे अपघात झाले. या अपघातातील जखमी अपंग झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिने रस्त्याची देखभाल किंवा किंवा डागडुजी करण्यात आली नाही. कडेला वाढलेली झुडपे, अपघातग्रस्त ठिकाणावर वाहने हळू चालवा तसेच धोक्याचे वळण लिहिलेले बोर्ड लावणे यासारख्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु याकडे सडक/अर्जुनीपासून शेंडा गावापर्यंत पूर्णत: दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कर्तबगारीचा परिचय देवून उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात सोमवारी दुपारी ३.३० वाजता सदर लोकमतचे वार्ताहर वामन लांजेवार हे सडक/अर्जुनी येथे येत असताना याच वळणावर समोरून येणाऱ्या आॅटोच्या जबर धक्क्याने पत्नीसह जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने ते अपंगच झाले आहेत. याला जबाबदार कोण?त्याचप्रमाणे सडक/अर्जुनीच्या बाजार चौकात आॅटो चालक १५ ते २० प्रवासी भरूनच दिवसभर शेंडा ते सडक/अर्जुनी मार्गावर चालतात. कधीकधी चालकाला बसायला जागा राहत नाही व तो वाहनावर ताबा ठेवू शकत नाही, असे अनेकदा पहायला मिळते. बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती बिकटच असते. हा सर्व प्रकार पोलीस वर्दीवर राहून उघड्या डोळ्याने ते खांबासारखे उभे राहून बघतात. परंतु हप्ता वसुलीसाठी कोणतीच कारवाई करीत नाही, असा आरोप नागरिकांचा आहे. सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर अपघातांना आमंत्रण देणारी अनेक वळणे आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आतापर्यंत नऊ अपघात व सध्या एकाच पंधरवाड्यात तीन जबर अपघात घडूनही अधिकारी मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. नुसत्या वेतनासाठीच ते उपस्थिती दाखवत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सफाई करण्यात यावी. जेणेकरून अपघात टाळता येतील. अन्यथा अपघातग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत व नुकसान भरपाई मिळेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठेवण्यात येईल, त्यांना इतरत्र हलविण्यात येणार नाही, असे वाहतूकदारांनी ठणकावून सांगितले आहे.