शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

सा.बां.विभागाच्या कारभाराने पंधरवाड्यात तीन अपघात

By admin | Updated: October 16, 2014 23:27 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील

वामन लांजेवार - शेंडा कोयलारीसडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तींना अपंगत्व वाट्याला आले असून वाटसरूंनी संताप व्यक्त केला आहे. सडक/अर्जुनीवरून तीन किमी अंतरावर असलेल्या केसलवाडा (मुनिश्वर टोला) जवळ जीवघेणे वळण असून रस्त्यांच्या दोन्ही कडेला जंगल, झुडपे व उंच गवत वाढलेले आहे. त्यामुळे आमोरसमोरून येणारी वाहने एकमेकांना दिसत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत नऊ तर एकाच पंधरवाड्यात तीन मोठे अपघात झाले. या अपघातातील जखमी अपंग झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिने रस्त्याची देखभाल किंवा किंवा डागडुजी करण्यात आली नाही. कडेला वाढलेली झुडपे, अपघातग्रस्त ठिकाणावर वाहने हळू चालवा तसेच धोक्याचे वळण लिहिलेले बोर्ड लावणे यासारख्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु याकडे सडक/अर्जुनीपासून शेंडा गावापर्यंत पूर्णत: दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कर्तबगारीचा परिचय देवून उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात सोमवारी दुपारी ३.३० वाजता सदर लोकमतचे वार्ताहर वामन लांजेवार हे सडक/अर्जुनी येथे येत असताना याच वळणावर समोरून येणाऱ्या आॅटोच्या जबर धक्क्याने पत्नीसह जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने ते अपंगच झाले आहेत. याला जबाबदार कोण?त्याचप्रमाणे सडक/अर्जुनीच्या बाजार चौकात आॅटो चालक १५ ते २० प्रवासी भरूनच दिवसभर शेंडा ते सडक/अर्जुनी मार्गावर चालतात. कधीकधी चालकाला बसायला जागा राहत नाही व तो वाहनावर ताबा ठेवू शकत नाही, असे अनेकदा पहायला मिळते. बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती बिकटच असते. हा सर्व प्रकार पोलीस वर्दीवर राहून उघड्या डोळ्याने ते खांबासारखे उभे राहून बघतात. परंतु हप्ता वसुलीसाठी कोणतीच कारवाई करीत नाही, असा आरोप नागरिकांचा आहे. सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर अपघातांना आमंत्रण देणारी अनेक वळणे आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आतापर्यंत नऊ अपघात व सध्या एकाच पंधरवाड्यात तीन जबर अपघात घडूनही अधिकारी मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. नुसत्या वेतनासाठीच ते उपस्थिती दाखवत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सफाई करण्यात यावी. जेणेकरून अपघात टाळता येतील. अन्यथा अपघातग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत व नुकसान भरपाई मिळेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठेवण्यात येईल, त्यांना इतरत्र हलविण्यात येणार नाही, असे वाहतूकदारांनी ठणकावून सांगितले आहे.