शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहरातील २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:51 IST

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेंतर्गत २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. अमरावती येथील डॉक्टरांनी हे निर्बिजीकरण केले. मोहिमेचा हा पहिला टप्पा असून पुन्हा मोहीम राबविल्यानंतर शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या आटोक्यात येणार.

ठळक मुद्देमोहिमेचा पहिला टप्पा : शहरात सुमारे ८ हजार कुत्र्यांचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेंतर्गत २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. अमरावती येथील डॉक्टरांनी हे निर्बिजीकरण केले. मोहिमेचा हा पहिला टप्पा असून पुन्हा मोहीम राबविल्यानंतर शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या आटोक्यात येणार.शहरात आजघडीला प्रत्येकच भागात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कित्येक भागात तर रात्रीला लोकांना ये-जा करताना कुत्रे मागे धावत असल्याने त्रास होऊ लागला आहे. शिवाय मध्यंतरी पिसाळलेल्या कुत्र्याने कित्येकांना चावा घेतल्याचे प्रकारही शहरात घडले आहेत. मोकाट कुत्र्यांची ही वाढती संख्या शहरवासी व नगर परिषदेसाठी डोकदुखीची ठरत होती. यावर तोडगा काढण्यासाठी व शहरवासियांची ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २७ आॅक्टोबर २०१७ ला घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मांडला होता.गंभीर विषय असल्याने या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली होती. त्यानुसार, अमरावती येथील लक्ष्मी एनीमल वेलफेयर या डॉ. अरविंद उडाखे यांच्या संस्थेला कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम देण्यात आले. डॉ. उडाखे यांनी २६ आॅक्टोबरपासून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम सुरू केले. त्यांना शहरातील २ कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार, १७ जानेवारीपर्यंत त्यांनी दिलेल्या टार्गेटची पूर्तता केली आहे. विशेष म्हणजे, शहरातील लोकसंख्येच्या आधारावर कुत्र्यांची संख्या ठरविण्याचे समिकरण असून त्यानुसार शहरात जवळपास ८ हजार कुत्रे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातील २५ टक्के म्हणजेच २ हजार कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे टार्गेट यंदा घेण्यात आले होते.पहिल्या टप्प्यात या २ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून आता पुढे टप्प्या-टप्प्याने ही मोहीम राबविल्यास शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या मार्गी लागणार आहे.कुत्रे पक डण्यासाठी आसामचे पथकडॉ.उडाखे यांनी कु त्रे पक डण्यासाठी आसाम येथील ४-५ मुलांचे पथक गोंदियात आणले होते. हे पथक कुत्र्यांना पकडत होते. त्यावर डॉ. उडाखे शस्त्रक्रिया करीत होते. शस्त्रक्रिया झाल्यावर २४ तास त्यांच्यावर निगरानी व औषधोपचार करून त्यानंतर कुत्र्यांना सोडले जात होते.