लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. जिल्ह्यात २८४.२ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.शनिवारी (दि.२) पावसाचा अंदाजही दिसत नसताना रविवारी (दि.३) पहाटे मात्र पावसाने हजेरी लावली.गोंदिया, देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यात दमदार पाऊस बरसला आहे. तर अन्यत्र साधारण पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मालमत्ता किंवा जिवीतहानी झालेली नाही. मात्र शेतात असलेल्या चना, गहू व अन्य पिकांना या पावसाचा फटका बसणार असल्याचे समजते.यंदा उन्हाळी धान पिकासाठी जलाशयांचे पाणी न मिळाल्याने कित्येक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस, लाखोळी, उडीद, राई, वटाणा आदि रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र दर महिन्यातच पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान होत राहिले. मागील महिन्यातील पावसानेही पिकांची नासाडी केली. आताच्या पावसाने हरभराला फटका बसला आहे. शिवाय आंब्याचा मोहरही मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा उत्पादनवरही परिणाम पडणार आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.विशेष म्हणजे, रविवारी जिल्ह्यात २८४.२ मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.६ एवढी सरासरी आहे.यात गोंदिया तालुक्यात सर्वाधीक ८२ मीमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी पाऊस गोरेगाव तालुक्यात बरसला असून १८.२ एवढी नोंद घेण्यात आली आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पावसाची नोंद घेण्यात आलेली नाही.गोठ्याचे छत उडालेरविवारी आलेल्या वादळी वारा व पावसामुळे आमगाव तालुक्यातील ग्राम भालीटोला येथील शेतकरी श्रीराम लाडकू यांच्या गोठ्यातील लोखंडी छत उडाले. यात त्यांचे २ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली अशी त्यांची मागणी आहे.
जिल्ह्याला अकाली पावसाने झोपडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:02 IST
रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे.
जिल्ह्याला अकाली पावसाने झोपडले
ठळक मुद्देकाही तालुक्यांत जोरदार पाऊस : जिल्हयात २८४.२ मीमी पावसाची नोंद