शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

जिल्ह्याला अकाली पावसाने झोपडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:02 IST

रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे.

ठळक मुद्देकाही तालुक्यांत जोरदार पाऊस : जिल्हयात २८४.२ मीमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. जिल्ह्यात २८४.२ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.शनिवारी (दि.२) पावसाचा अंदाजही दिसत नसताना रविवारी (दि.३) पहाटे मात्र पावसाने हजेरी लावली.गोंदिया, देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यात दमदार पाऊस बरसला आहे. तर अन्यत्र साधारण पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मालमत्ता किंवा जिवीतहानी झालेली नाही. मात्र शेतात असलेल्या चना, गहू व अन्य पिकांना या पावसाचा फटका बसणार असल्याचे समजते.यंदा उन्हाळी धान पिकासाठी जलाशयांचे पाणी न मिळाल्याने कित्येक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस, लाखोळी, उडीद, राई, वटाणा आदि रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र दर महिन्यातच पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान होत राहिले. मागील महिन्यातील पावसानेही पिकांची नासाडी केली. आताच्या पावसाने हरभराला फटका बसला आहे. शिवाय आंब्याचा मोहरही मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा उत्पादनवरही परिणाम पडणार आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.विशेष म्हणजे, रविवारी जिल्ह्यात २८४.२ मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.६ एवढी सरासरी आहे.यात गोंदिया तालुक्यात सर्वाधीक ८२ मीमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी पाऊस गोरेगाव तालुक्यात बरसला असून १८.२ एवढी नोंद घेण्यात आली आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पावसाची नोंद घेण्यात आलेली नाही.गोठ्याचे छत उडालेरविवारी आलेल्या वादळी वारा व पावसामुळे आमगाव तालुक्यातील ग्राम भालीटोला येथील शेतकरी श्रीराम लाडकू यांच्या गोठ्यातील लोखंडी छत उडाले. यात त्यांचे २ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस