शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

जिल्हा प्रदूषण नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:00 PM

जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.रेड मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भात सूचना संबंधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योगांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल असून यांची प्रदूषण नियंत्रण तपासणी झालीच नाही. राईस मिल मधून फक्त धान भरडाई करुन तांदूळ बनविणाºया २०० तर उष्णा राईस तयार करणाºया ६० राईस मिल आहेत. तांदूळ तयार करण्याºया राईस मिल यांना प्रदूषण मंडळ प्लेन मिल तर उष्णा तांदूळ काढणाºया मिलांना पॅरामीट राईसमिल म्हणून संबोधतात.या राईस मिलमुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाºया प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र शहरात नाही. गोंदिया जिल्हाची निर्मिती होऊन २० वर्षे होत असताना गोंदियात प्रदूषण वाढत आहे. मात्र येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नाही. किंवा प्रदूषण मोजणारे केंद्रही नाही. प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. परंतु त्या दिशेने प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची संख्या वाढत असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या दीड लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. परंतु राईस मिलमधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुध्दा दुुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण मोजणाºया केंद्रासाठी संबंधीत विभागाकडून तसा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही.

पावसाळयात निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत नगर परिषदेच्या माध्यमातून मान्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात आहे. यांतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. याशिवाय लवकरच एक विशेष बैठक घेवून मान्सूनसाठीचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांना त्रास होवू नये यादृष्टीने स्वच्छता विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.- अशोक इंगळे, नगराध्यक्षपावसाळयात शहरवासीयांना त्रास होतो ही बाब खरी आहे. मात्र यंदा शहरवासीयांना या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने एक महिना पूर्वीपासून कामाला सुरूवात केली आहे. मॉन्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात असून शहरातील नाल्यांवर प्रामुख्याने लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय स्वच्छता विभागाची बैठक घेऊन सर्वांना आवश्यक त्या उपाय योजनांबाबत निर्देश देण्यात आले आहे.- चंदन पाटील, मुख्याधिकारी

टॅग्स :pollutionप्रदूषण