शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जिल्हा ओलाचिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:01 IST

मागील दोन-तीन दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एंट्री मारली आहे. त्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली रात्रभर बरसलेल्या पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे, या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगुरूवारी रेड अलर्ट : प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन-तीन दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एंट्री मारली आहे. त्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली रात्रभर बरसलेल्या पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे, या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिवाय गुरूवारी (दि.८) जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता.जुलै महिन्यातील शेवटपासून सुरू असलेल्या पावसाने दोन-तीन दिवसांपासून उघाड दिली होती. त्यानंतर बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली. दिवस व रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.तालुक्यातील खमारी मंडळात ६७ मिमी पाऊस बरसल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच खूश असून शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. तालुक्यात आजही काही भागांत रोवणी झालेली नसल्याने शेतकरी पावसाचा फायदा घेत रोवणीसाठी जुंपल्याचे दिसले. रिमझीम बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती नसली तरीही गुरूवारी (दि.८) जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. अवघ्या जिल्ह्यातच हा पाऊस बरसत असला तरीही अपेक्षेच्या तुलनेत पाऊस कमी आहे.जिल्हयात आतापर्यंत सरासरी ७८६.११ मिमी पाऊस बरसणे अपेक्षित असताना आतापर्यंत सरासरी ५५४ मिमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. म्हणजेच आजही सरासरी २३२ मिमी पावसाची तूट जिल्ह्यात कायम आहे. पावसामुळे रजेगाव येथील बाघनदीच्या लहान पुलाच्या १ मीटर वरून पाणी वाहत आहे. तसेच २४ तासांत अत्यधिक पावसाचा इशारा देण्यात आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुजारीटोलाचे गेट उघडण्याची शक्यताअवघ्या जिल्ह्यात बरसत असलेल्या या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले असून जिल्ह्यातील पुजारीटोला प्रकल्पातही गुरूवारी दुपारपर्यंत ७१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने सायंकाळपर्यंत पाणीसाठा वाढणार व पुजारीटोला प्रकल्पाचे गेट उघडले जाणार असल्याची शक्यता विभागाने वर्तविली.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती