शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM

हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले.

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : उत्पादन घटणार,वातावरणातील बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मूंग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले. मागील पंधरा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठविली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असून शेतकºयांनी तोडणी केलेली मिरची वाळविण्यासाठी ठेवली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीक सुध्दा निघण्याच्या मार्गावरुन असून त्याला सुध्दा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. तर बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.३५ हजार हेक्टरमधील पिके संकटातयंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. तर १० हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचितजिल्ह्यात आक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस