शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले.

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : उत्पादन घटणार,वातावरणातील बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मूंग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले. मागील पंधरा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठविली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असून शेतकºयांनी तोडणी केलेली मिरची वाळविण्यासाठी ठेवली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीक सुध्दा निघण्याच्या मार्गावरुन असून त्याला सुध्दा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. तर बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.३५ हजार हेक्टरमधील पिके संकटातयंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. तर १० हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचितजिल्ह्यात आक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस