शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले.

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : उत्पादन घटणार,वातावरणातील बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मूंग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले. मागील पंधरा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठविली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असून शेतकºयांनी तोडणी केलेली मिरची वाळविण्यासाठी ठेवली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीक सुध्दा निघण्याच्या मार्गावरुन असून त्याला सुध्दा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. तर बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.३५ हजार हेक्टरमधील पिके संकटातयंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. तर १० हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचितजिल्ह्यात आक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस