शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने पाॅझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्ध या आधारावर ...

ठळक मुद्देआठवडाभरात २० हजारांवर चाचण्या : १७३ पॉझिटिव्ह: जिल्हा पहिल्याच स्तरात कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने पाॅझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्ध या आधारावर राज्यातील जिल्ह्याचे पाच स्तर करून त्या जिल्ह्यांमध्ये अनेक लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दर आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल किंवा कडक करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य शासनाने शनिवारी (दि.११) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली त्यात गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के असून तो राज्यात सर्वांत कमी आहे.गोंदिया जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. परिणामी मागील पाच दिवसांपासून सर्वच व्यवहारांची गाडी रूळावर आली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिलासादायक चित्र आहे. आठवडाभरात जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण २०७५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात १७३ जण पॉझिटिव्ह आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८३ टक्के आहे तर राज्यातील इतर जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांहून अधिकच आहे. त्यामुळे ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे तर केवळ १.८ टक्के ऑक्सिजन बेड भरले असून मोठ्या प्रमाणावर बेड रिकामे आहे. हीसुद्धा जिल्हावासीयांच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. जिल्ह्याचा पहिल्याचा स्तरात समावेश असल्याने सर्वच व्यवहार सुरळीत सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध ‘जैसे थे’ राहणार आहेत.  

पुन्हा लॉकडाऊनची वेळ नकोच - गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने कमी होत आहे ही निश्चितच जिल्हावासीयांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आणि योग्य खबरदारी घेतल्यास जिल्ह्यावर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी.  

कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा राज्यात सर्वांत कमी आहे. त्याचे श्रेय जिल्ह्यातील जनतेलाच जाते. जशी काळजी जिल्ह्यावासीय आता घेत आहेत तशीच काळजी यापुढे घेत राहिल्यास जिल्हा निश्चितच लवकरच कोरोनामुक्त होईल. - राजेश खवले, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या