शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:18 IST

विविध उपक्रमात विद्यार्थी मनापासून भाग घेतात. उत्कृष्ट कार्य करतात.

ठळक मुद्देएक दिवस विद्यार्थ्यांसोबत उपक्रम : मोहगाव देवी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विविध उपक्रमात विद्यार्थी मनापासून भाग घेतात. उत्कृष्ट कार्य करतात. त्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत बालकदिनी ‘एक दिवस विद्यार्थ्यांसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी राबविला. याशिवाय जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहगाव देवी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.जिल्ह्यात बºयाच शाळांमध्ये नवोपक्रम राबविले जातात. ते नवोपक्रम शाळांपुरते मर्यादित राहतात. त्या नवोपक्रमाची दखल क्वचितच घेतली जाते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यवंशी यांनी ‘एक दिवस विद्यार्थ्यांसोबत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला. मोहगाव देवी येथे पाणीपुरवठा व्हावा यासाठी सूर नदीवर वनराई बंधारा तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सुर्यवंशी यांनी ही संकल्पना वास्तवात आणली.सप्टेंबर महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल मोहगाव देवी, जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी येथील शाळेच्या बालकांच्या चिमुकल्या हाताने वनराई बंधारा तयार करण्यात आला. त्याचवेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची नावे कळविण्याचे निर्देश गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांना दिले होते. बालक दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी एक दिवस बालकांसोबत या उपक्रमाला सुरुवात केली. यात जिल्ह्यातील निवडक शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी पंचबुद्धे, प्राजक्ता ठवकर, आचल लेंडे, सोनाली चकोले, जान्हवी लांबट यांच्यासह शिक्षक गजानन वैद्य, शोभा कोचे तसेच जि.प. शाळा मोहगाव देवीचे विद्यार्थी छबीता भोयर, अपोशना डोंगरे, अर्पिता मुळे, अश्विना पडोळे, भाग्यश्री मडामे व शिक्षक किशोर कांबळे, माधवी नंदनवार यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात प्रवेश केला. सीईओंनी त्यांनी केलेल्या कार्याचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. शैक्षणिक अडचणी, समस्या याबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी अधिनस्त संपूर्ण विभागाचा कारभार बघता आला. अधिकाºयांच्या प्रत्यक्ष भेटी घेता आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर सीईओ यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी भेट घालून दिली. जिल्हाधिकारी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाही विद्यार्थ्यांसोबत काही वेळ घालवत शैक्षणिक विषयावर संवाद साधला.या उपक्रमाने आपण नवीन जगात गेलोय, वेळेची महती, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे बळ, प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया दहावीची विद्यार्थिनी साक्षी पंचबुद्धे, प्राजक्ता ठवकर, आचल लेंडे, जानवी लांबट, सोनाली चकोले यांनी व्यक्त केली. अविस्मरणीय क्षणाचा गाठोळा बांधून मुले शाळेत परतली तेव्हा त्यांच्या चेहºयावरचे तेज अनुभूती देत होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची पे्रेरणा व सामाजिक बांधिलकीची जाणीव होईल, अशी प्रतिक्रिया उपक्रमात सहभागी शिक्षक गजानन वैद्य, शोभा कोचे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.