शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला मुख्याधिकाºयांना जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:32 IST

नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून नवीन पाळी सुरू झाली. आता याला सुमारे १७ महिने लोटत असूनही नगर परिषदेची फक्त एकच सर्वसाधारण सभा झाली आहे.

ठळक मुद्देफक्त एकच सर्वसाधारण सभा : नगर परिषदेत विशेष सभांवरच भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ पासून नवीन पाळी सुरू झाली. आता याला सुमारे १७ महिने लोटत असूनही नगर परिषदेची फक्त एकच सर्वसाधारण सभा झाली आहे. यामुळे एका सदस्याच्या तक्रारीवरून खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घातले असून नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना प्रकरणी जाब विचारला आहे. यामुळे आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हा विषय सध्या नगर परिषद वर्तुळात चर्चेत आहे.नियमानुसार, नगर परिषदेला दोन महिन्यांत एक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. त्यातही, नगर विकास विभागाच्या २५ जानेवारी २०१८ च्या राजपत्रानुसार नगर परिषदेला दर महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही नवीन कार्यकाळ सुरू झाल्यानंतर नगर परिषदेची मे २०१७ मध्ये सर्वसाधारण सभा झाली आहे. त्यानंतर मात्र सर्वसाधारण आतापर्यंत घेण्यात आलेली नाही. फक्त विशेष सभा बोलावून त्यातच विषयांना मंजुरी दिली जात असल्याचे प्रकार सुरू आहे.एका प्रकरणाला घेऊन उच्च न्यायालयाने सभांवर बंदी लावली होती. त्यामुळे सभा घेता आल्या नाहीत हे समजते. मात्र आॅक्टोबर महिन्यात उच्च न्यायालयाने जनहितार्थ असलेल्या विषयांवर सभा घेण्यास मंजुरी दिली होती अशी माहिती आहे. त्यानंतरही नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली नाही. यानंतर ग्रामपंचायत व लोकसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागली होती. त्यामुळेही सर्वसाधारण सभा घेता आली नाही असे समजते. मात्र हे सर्व सोडूनही सर्वसाधारण सभा घेण्यासाठी चांगली अवधी होती.नगर परिषदेत सभा बोलाविण्याचे अधिकार अध्यक्षांना असल्याने नगर परिषद प्रशासनाकडून अध्यक्षांना वारंवार स्मरण पत्र देण्यात आले.मात्र एवढ्यावरही सर्वसाधारण घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, कित्येकदा विशेष सभा बोलावून विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. यातून विशेष सभांवरच जास्त भर दिला जात आहे असे नगर परिषदेत बोलले जात आहे. आता यामागे काय कारण आहे हे कुणास ठाऊक. मात्र सर्वसाधारण सभा काही घेण्यात आली नाही.नगरसेविकेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारया प्रकरणात आर्श्चयाची बाब अशी की, भारतीय जनता पक्षाच्याच एका नगरसेविकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्याने त्यांच्या प्रभागातील प्रतिनिधीत्व करता येत नसल्याची खंत त्यांनी तक्रारीत व्यक्त केल्याची माहिती आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणात लक्ष घातले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणी १८ जून रोजी पत्र पाठविले असून त्यात स्वयंस्पष्ट अहवाल मागीतला आहे. सत्ता पक्षातीलच एका सदस्याने एवढे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे नगर परिषद व राजकीय वर्तुळात सध्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे. यातून सत्ता पक्षातील सदस्यच खूश नसल्याचेही या प्रकारातून दिसून आले असून अंतर्गत कलह आता बाहेर येऊ लागले आहे.