शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:46 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते. पावसाची कोसळधार कायम असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका बसल्याने अर्जुनी मोरगाव व आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एकूण ४४ कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. मुसळधार पावसामुळे ४९० घरे व गोठे पडून नुकसान झाले. मागील चौवीस तासात जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून पावसाची स्थिती पाहुन पुजारीटोला धरणाचे ८ तर धापेवाडा धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले होते. पावसामुळे जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक मार्ग बंद झाले होते त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत आहेत. तर नदी आणि नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही गावांचा संर्पक तालुका आणि जिल्ह्याशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुटला होता. पुलावरील पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आहे. सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद आमगाव तालुक्यात १९१.८५ मिमी झाली. तर त्या पाठोपाठ सालेकसा तालुक्यात १७३.६२, गोरेगाव १२८.३३ मिमी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात ९५.२० मि.मी.पावसाची नोंद झाली. एकूण ३३ महसूल मंडळापैकी २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील तीन चार वर्षांत प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे बोलल्या जाते. दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली रोवणी वाहून गेली.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे आणि पाईप वाहून गेल्याने आर्थिक फटका बसला. पावसामुळे घरे आणि गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.रस्त्यावर वाहनांच्या रांगाजिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगोली नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गोरेगाव-सोनी-ठाणा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर आमगाव-देवरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने आमगाव-देवरी, सालेकसा-देवरी, आमगाव-कामठा, आमगाव-वडेगाव, बिजेपार-साखरीटोला, बिजेपार- अंजोरा, बोरकन्हार, बिजेपार-सालेकसा-गांधीटोला, सालेकसा-राजनांदगाव मार्ग बंद होता. कमरगाव नदीवरील पुलावर पाणी असल्याने मुंडीपार-तेढा या गावाचा संर्पक तुटला होता. आमगाव-शिवणी, आमगाव-चिरचाळबांध, आमगाव-तिगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.सुदैवाने अनर्थ टळलामागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. आमगाव-देवरी मार्गावरील नाल्यावरुन पाणी वाहत असताना निमगाव येथील एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पुलावरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ट्रॅक्टर नाल्याच्या काठावर अडकले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान साधल्याने मोठा अनर्थ टळला. दोन ट्रक्टरच्या मदतीने नाल्यावर अडकलेले ट्रक्टर बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणीगोंदिया नगर परिषदेने शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफ सफाई न केल्याने मुसळधार पावसामुळे नाल्या चोख होवून सुर्याटोला, शास्त्रीवार्ड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने उपाय योजना सुरू केल्याची माहिती आहे.पन्नासावर गावांचा संपर्क तुटलामंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. तर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला धरणाचे ८ तर धापेवाडा प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदी आणि नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० वर गावांचा जिल्हा आणि तालुक्याशी संपर्क तुटला होता.रस्त्यावरच अंत्यसंस्कारगोंदिया येथील पांगोली नदी परिसरात स्मशानभूमी आहे. मात्र पांगोली नदीला पूर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानघाटावर जाता आले नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्काराचा विधी आटोपावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर