शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

जिल्हा झाला बालकामगार मुक्त ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

गोंदिया जिल्ह्यात चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल व कपडे यासारख्या वस्तूंच्या दुकानात आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही अत्यंत अनिष्ट प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. बालकामगार प्रथा हा समाजाला लागलेला कलंक असून याला दूर करु न बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे.

ठळक मुद्दे५६६ प्रतिष्ठानांना भेटी : चार वर्षांपासून एकही बालकामगार मिळाला नाही

नरेश येटरे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणा : शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनाने प्रगत शैक्षणीक महाराष्ट्राची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरिबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १६ बाल संक्रमण शाळा सद्यस्थितीत बंद झाल्या आहेत. एकही बालमजूर मागील ४ वर्षांपासून कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळला नाही. म्हणजेच, गोंदिया जिल्हा बालकामगारमुक्त झाला की बालकामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.गोंदिया जिल्ह्यात चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल व कपडे यासारख्या वस्तूंच्या दुकानात आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही अत्यंत अनिष्ट प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. बालकामगार प्रथा हा समाजाला लागलेला कलंक असून याला दूर करु न बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे. गरिबीमुळे न शिकणारी मुले-मुली कामधंदा करून अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग व व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.बालकामगार निर्माण होण्यास आई-वडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असते. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आदी पारंपारीक व्यवसाय करतात. जनावरांच्या मदतीने माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा, भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. ज्या उद्योग व व्यवसायांमध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करु न त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यांची पिळवणूक थांबवून हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे.यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. बालकामगार व त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगार विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे. त्यांना शासनाकडून शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. धोकादायक उद्योग व व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांचे सर्वेक्षण डिसेंबर महिन्यात करण्यात आले. परंतु एकही कामगार मिळाला नाही असे सांगण्यात आले.चार वर्षात तपासली ५६६ दुकानेजिल्ह्यात कुठेही बालकामगार काम तर करीत नाही यासाठी बालकामगार आयुक्त कार्यालयाने सन २०१६ पासून डिसेंबर २०१९ या ४ वर्षात जिल्ह्यातील ५६६ दुकाने तपासली. कोणत्याही दुकानावर बालकामागर आढळला नाही असे सह आयुक्त कामगार कार्यालय सांगते. सन २०१६ मध्ये ९० प्रतिष्ठान, सन २०१७ मध्ये २८०, सन २०१८ मध्ये ८२, सन २०१९ मध्ये मार्च महिन्यात २७, जून महिन्यात २२, जुलै महिन्यात ३३ व नोव्हेंबर महिन्यात ३२ अशी एकूण ११४ प्रतिष्ठाने तपासण्यात आली. अशाप्रकारे मागील ४ वर्षात ५६६ प्रतिष्ठाने तपासण्यात आली. परंतु जिल्ह्यात एकही बालमजूर मिळाला नाही.सर्वेक्षणात आढळली ‘ती’ कोणती बालकेडिसेंबर महिन्यात बालकामगार शोध मोहीम राबविण्यात आली. यात काही बालके आढळली. परंतु ही बालके कामगार नाहीत असे सहायक आयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे. मिळालेली बालके कोणती आहेत ती नियमित शाळेत दाखल होती काय, शाळा बाह्य आहेत काय, याचीही पाहणी केली जाणार आहे. मागील ४ वर्षात एकही बालकामगार न आढळल्याने जिल्ह्यात सर्वच व्यापारी, कारखानदार, विटभट्टी मालक बाल कामगार निर्मुलन संकल्पना राबवित आहेत काय असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.