शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी मित्रांना कृषी ज्ञानकोष खंडाचे वितरण

By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST

राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती तालुका ...

बोंडगावदेवी : राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी दिन म्हणून बुधवारी (दि.२) ला साजरी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील शेतकरी मित्रांना कृषी ज्ञानकोष खंड १ ते ६ चे वाटप करून ग्रामस्थांना आधुनिक कृषी ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी अभिनव प्रयोग करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित कृषी दिन व कृषी ज्ञानकोष खंड वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, एस.जी. धाकले, ए.बी. ठाकूर उपस्थित होते. सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर एन.एच. मुनेश्वर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मुनेश्वर म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी पारंपारिक शेतीकडून शेतकऱ्यांना सुधारित तांत्रिक व आधुनिक शेतीकडे वळवून संपूर्ण राज्यात तथा देशात हरित क्रांती घडवून आणली. त्यांच्या सूचक मार्गदर्शनाने देशात विपुल प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध असून स्वयंपूर्ण होण्यासाठी स्व. वसंतराव नाईक सतत धडपडत राहिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेततळे, शेडनेट हाऊस, ठिंबक सिंचन शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचविल्या जात आहेत. शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी वेळोवेळी सभा घेऊन कृषी मार्गदर्शन केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांना कृषी ज्ञान कोष खंड १ ते ६ चे वाटप मुनेश्वर, चांदेवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी कार्यालयातील व्ही.एच. कोहाडे यांनी केले. आत्मा योजना, शेतकरी मित्रांनी करावयाची कामे, समूह गट शेती, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, अनुदानाच्या योजना याबाबत माहिती त्यांनी दिली. आभार ए.एस. उपवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी कार्यालयातील कर्मचारी वर्ग, तालुक्यातील शेतकरी मित्र बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)अंगणवाडी पर्यवेक्षिकांची रिक्त पदे भरागडचिरोली : लहान बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण असते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पर्यवेक्षिकांची जिल्ह्यातील अनेक पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे. रिक्त पदांचा परिणाम अंगणवाडी सेवेवर होत असल्याने पर्यवेक्षिकांचे रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात अंगणवाडी कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. अनेक अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे २ ते ३ केंद्रांचा पदभार सोपविण्यात आला तर काही ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकाऱ्यांच्या पदाची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे सोपविण्यात आली आहे.