शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

जिल्ह्यात ५० टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

गोंदिया : खरीप हंगामात खते, बियाणे,शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्ड आणि शासनाच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. ...

गोंदिया : खरीप हंगामात खते, बियाणे,शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्ड आणि शासनाच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण ३०० काेटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज खरिपासाठी वाटप करण्यात येणार असून यापैकी आतापर्यंत १२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्य शासन आणि नाबार्डने गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १६७ कोटी ८५ लाख, राष्ट्रीयीकृत बँकेला ९ कोटी १६ लाख रुपये व ग्रामीण बँकांना ३ कोटी ६० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज असते. पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. सध्या पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी दिसून येत आहे. आतापर्यंत सर्वाधिक ७६ कोटी ६६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेने केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेने १ कोटी २० लाख आणि ग्रामीण बँकांनी १ कोटी ३० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.

............

२६ हजार ५७२ शेतकऱ्यांनी केली पीक कर्जाची उचल

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण २६५७२ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली आहे. यात सर्वाधिक १६७८५ शेतकरी जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल केली आहे; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांची पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अद्यापही संथगतीनेच सुरु आहे.

...............