शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

शासनाच्या मामा तलावांची परस्पर लावताहेत विल्हेवाट

By admin | Updated: July 12, 2014 23:42 IST

राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या

आमगाव : राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय या तलावाच्या माध्यमाने पूर्ण होते. परंतु या तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाचे अधिकारीच या तलावांची परस्पर विल्हेवाट लावत असल्याने आता शेतकरी सिंचन तर नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.राज्य शासनाने सिंचनासाठी उपयुक्त ठरलेल्या तलावांची दुरुस्ती व देखरेख व्यवस्थितपणे व्हावी यासाठी अनेक उपाययोजना केल्या. तर तलावांच्या माध्यमाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी तर भविष्यात पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने दुरुस्ती व खोलीकरणासाठी उपलब्ध करून दिला.जिल्ह्यात शासनाच्या मनरेगा अंतर्गत तलावांच्या खोलीकरणाची कामे करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृतपणे काही व्यक्ती विशेषांनी तलावांच्या खासगी अतिक्रमणामुळे या तलावांची दुरुस्ती व खोलीकरणाचे कार्य प्रशासनाला करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणारे पाणी मिळाले नाही. तर या तलावाच्या सिंचन सुविधेअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित व्हावे लागले.तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मत्स्य तलावांची संख्या १२६ आहे. यात शहरातच सहा तलाव आहेत. परंतु अनधिकृतपणे या तलावांवर अतिक्रमण असल्याने सिंचनाची सोय उपलब्ध करता आली नाही.येथील गट क्रमांक ११० व १४२ यात असलेल्या तलावांची शासनाच्या अधिकाऱ्यांनीच परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे या तलाव परिसरात अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. यासंबंधी शासनाकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली आहे. परंतु राजकीय दडपणाखाली अतिक्रमणाला वाव मिळात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर या तलावांच्या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या स्त्रोतांमध्ये होणारी वाढही थांबली आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईला नागरिक समोर होत आहेत. राज्य शासनाच्या सिंचन सुविधेकरिता असलेल्या तलावांवर होत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाला आळा घालण्याची आवश्यकता आहे. (शहर प्रतिनिधी)