शहरं
Join us  
Trending Stories
1
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
4
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
5
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
6
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
8
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
9
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
10
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
11
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
12
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
13
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
14
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
15
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
16
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
17
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
18
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
19
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
20
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मामा तलावांची परस्पर लावताहेत विल्हेवाट

By admin | Updated: July 12, 2014 23:42 IST

राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या

आमगाव : राज्यात गोंदिया जिल्हा मामा तलावांच्या ओळखीने अग्रेसर आहे. जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेले मामा तलाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सुविधा आहे तर सिंचनासह नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय या तलावाच्या माध्यमाने पूर्ण होते. परंतु या तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाचे अधिकारीच या तलावांची परस्पर विल्हेवाट लावत असल्याने आता शेतकरी सिंचन तर नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत.राज्य शासनाने सिंचनासाठी उपयुक्त ठरलेल्या तलावांची दुरुस्ती व देखरेख व्यवस्थितपणे व्हावी यासाठी अनेक उपाययोजना केल्या. तर तलावांच्या माध्यमाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी तर भविष्यात पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने दुरुस्ती व खोलीकरणासाठी उपलब्ध करून दिला.जिल्ह्यात शासनाच्या मनरेगा अंतर्गत तलावांच्या खोलीकरणाची कामे करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृतपणे काही व्यक्ती विशेषांनी तलावांच्या खासगी अतिक्रमणामुळे या तलावांची दुरुस्ती व खोलीकरणाचे कार्य प्रशासनाला करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणारे पाणी मिळाले नाही. तर या तलावाच्या सिंचन सुविधेअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित व्हावे लागले.तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मत्स्य तलावांची संख्या १२६ आहे. यात शहरातच सहा तलाव आहेत. परंतु अनधिकृतपणे या तलावांवर अतिक्रमण असल्याने सिंचनाची सोय उपलब्ध करता आली नाही.येथील गट क्रमांक ११० व १४२ यात असलेल्या तलावांची शासनाच्या अधिकाऱ्यांनीच परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे या तलाव परिसरात अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. यासंबंधी शासनाकडे ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केली आहे. परंतु राजकीय दडपणाखाली अतिक्रमणाला वाव मिळात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर या तलावांच्या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या स्त्रोतांमध्ये होणारी वाढही थांबली आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईला नागरिक समोर होत आहेत. राज्य शासनाच्या सिंचन सुविधेकरिता असलेल्या तलावांवर होत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाला आळा घालण्याची आवश्यकता आहे. (शहर प्रतिनिधी)