शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

एकाच दिवशी जिल्ह्यात ५६१६ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यात यावेत, याकरिता जिल्हा विधी सेवा ...

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यात यावेत, याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए. आर.औटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम. बी. दुधे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी (दि.२५) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांत सर्वच प्रकाराच्या तडजोडपात्र न्यायप्रविष्ट व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत एकाच दिवशी जिल्ह्यातील ५६१६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीची सुरुवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दुधे, सामाजिक कार्यकर्ता निशा किन्नर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण न्यायालयांत प्रलंबित दिवाणी ७६६ प्रकरणांपैकी ७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली व दोन कोटी ३०लाख ९९ हजार २९७ रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायालयात प्रलंबित १४३३ फौजदारी प्रकरणांपैकी १६८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एक कोटी २३ लाख ९५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. पूर्व न्यायप्रविष्ट १७९३४ प्रकरणांपैकी ५३७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यातून ५८ लाख ९९ हजार ७३७ रुपयांची वसुली करण्यात आली. अशाप्रकारे एकूण २०१३३ प्रकरणांपैकी ५६१६ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला व त्यातून चार कोटी १३ लाख ९४ हजार ३४ रुपयांची वसुली करण्यात आली.

लोकअदालतीत न्यायाधीश एस. बी. पराते, जिल्हा न्यायाधीश ए. एम. खान, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. बी. लवटे, एस. जे. भट्टाचार्य, एन. आर. वानखडे, एस. व्ही. पिपळे, जे. एम. चव्हाण, आर. डी. पुनसे, व्ही. आर. आसुदानी, एस. डी. वाघमारे, व्ही. के. पुरी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कटरे, ॲड. मंजुलता चतुर्वेदी, प्रज्ञा डोंगरे, ज्योती भरणे, सुजाता तिवारी, अर्चना नंदघळे, रंजिता शुक्ला, वैशाली उके, रमाशंकर रॉय, नीना दुबे, सुनीता चौधरी, मंगला बनसोड, डॉ. अजय सुरवडे, सविता बेदरकर, सविता तुरकर, लक्ष्युराम नेताम, निरंजन हटकैया, रितू तुरकर, रवींद्र बडगे, पूजा तिवारी, वंदना पातरे, मधुकर नखाते उपस्थित होते.

..........

बॉक्स

११७४ फौजदारी प्रकरणे निकाली

स्पेशल ड्राइव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये ११७४ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. ती संपूर्ण निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रासातून सुटका मिळाली. या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे सदर लोकअदालतीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांकरिता सामाजिक कार्य करणारे मांग, गारुडी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना लोकअदालतीच्या पॅनलवर सदस्य म्हणून घेण्यात आले होते.