शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एकाच दिवशी जिल्ह्यात ५६१६ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यात यावेत, याकरिता जिल्हा विधी सेवा ...

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यात यावेत, याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए. आर.औटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम. बी. दुधे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी (दि.२५) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांत सर्वच प्रकाराच्या तडजोडपात्र न्यायप्रविष्ट व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत एकाच दिवशी जिल्ह्यातील ५६१६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोकअदालतीची सुरुवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दुधे, सामाजिक कार्यकर्ता निशा किन्नर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण न्यायालयांत प्रलंबित दिवाणी ७६६ प्रकरणांपैकी ७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली व दोन कोटी ३०लाख ९९ हजार २९७ रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायालयात प्रलंबित १४३३ फौजदारी प्रकरणांपैकी १६८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एक कोटी २३ लाख ९५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. पूर्व न्यायप्रविष्ट १७९३४ प्रकरणांपैकी ५३७४ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यातून ५८ लाख ९९ हजार ७३७ रुपयांची वसुली करण्यात आली. अशाप्रकारे एकूण २०१३३ प्रकरणांपैकी ५६१६ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला व त्यातून चार कोटी १३ लाख ९४ हजार ३४ रुपयांची वसुली करण्यात आली.

लोकअदालतीत न्यायाधीश एस. बी. पराते, जिल्हा न्यायाधीश ए. एम. खान, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. बी. लवटे, एस. जे. भट्टाचार्य, एन. आर. वानखडे, एस. व्ही. पिपळे, जे. एम. चव्हाण, आर. डी. पुनसे, व्ही. आर. आसुदानी, एस. डी. वाघमारे, व्ही. के. पुरी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कटरे, ॲड. मंजुलता चतुर्वेदी, प्रज्ञा डोंगरे, ज्योती भरणे, सुजाता तिवारी, अर्चना नंदघळे, रंजिता शुक्ला, वैशाली उके, रमाशंकर रॉय, नीना दुबे, सुनीता चौधरी, मंगला बनसोड, डॉ. अजय सुरवडे, सविता बेदरकर, सविता तुरकर, लक्ष्युराम नेताम, निरंजन हटकैया, रितू तुरकर, रवींद्र बडगे, पूजा तिवारी, वंदना पातरे, मधुकर नखाते उपस्थित होते.

..........

बॉक्स

११७४ फौजदारी प्रकरणे निकाली

स्पेशल ड्राइव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये ११७४ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. ती संपूर्ण निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रासातून सुटका मिळाली. या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे सदर लोकअदालतीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांकरिता सामाजिक कार्य करणारे मांग, गारुडी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना लोकअदालतीच्या पॅनलवर सदस्य म्हणून घेण्यात आले होते.