शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:56 IST

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसंजय रेवतकर : विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. क्षयरोग हा कितीही गंभीर व जिवघेणा आजार असला तरी रूग्णाने प्रामाणिकपणे औषधोपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याची माहिती संजय रेवतकर यांनी दिली.जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजीत क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अर्पित पालेवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश लोथे व रिजवाना शेख उपस्थित होते.डॉ. लोथे यांनी, क्षयरोग होण्याची कारणे, लक्षणे व क्षयरोगाचे निदान कसे करता येईल याविषयी माहिती दिली. रुग्णांनी अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी अशी प्राणघातक टी.बी. होत असल्याचे सांगितले. म्हणून रुग्णांनी पूर्वी उपचार करावा व प्रत्येक रुग्णाला दरमहा ५०० रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले.डॉ. पालेवार यांनी, क्षयरोगाची माहिती देत क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होणारा आजार आहे. त्यात ८५ टक्के फुफूसाचा क्षयरोग व १५ टक्के फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग होत असल्याचे सांगितले. तसेच बचावात्मक उपाय व उपचारावर माहिती दिली. संचालन करून प्रास्ताविक शेख यांनी मांडले. आभार निलेश सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी दृष्टी संस्था, ग्रामीण रुग्णालयातील रवी बघेल, अमित भिवसाने, मेश्राम, शेख यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स