शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:46 IST

आॅनलाईन लोकमतसोनपुरी : शालेय पोषण आहाराची देयके मागील चार महिन्यांपासून थकीत आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जवळचे पैसे खर्च करून पोषण आहार साहित्य खरेदी करणे बंद केले आहे. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.राज्यात शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत सर्व मुलांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद ...

ठळक मुद्देदेयके थकीत : शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका

आॅनलाईन लोकमतसोनपुरी : शालेय पोषण आहाराची देयके मागील चार महिन्यांपासून थकीत आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जवळचे पैसे खर्च करून पोषण आहार साहित्य खरेदी करणे बंद केले आहे. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.राज्यात शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत सर्व मुलांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत अनेक सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. राज्यात शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र व डिजिटल शाळा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्यात शासकीय आणि अनुदानित खासगी शाळांना मध्यान्ह भोजन योजना लागू आहे. सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो.मात्र मागील चार महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे देयक न निघाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील शिक्षक संघटनांनी एकत्र येवून जेव्हापर्यंत पोषण आहारासाठी अनुदान मिळत नाही तेव्हापर्यंत शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.शाळांना केवळ तांदळाचा पुरवठासध्या प्रत्येक शाळांना फक्त तांदूळ पुरवठा होत आहे. भाजी आणि इतर किराणा सामान मुख्याध्यापकांनी खरेदी करावे, असे निर्देश शासनाने दिले आहे. देयक सादर केल्यानंतर देयकाची रक्कम देण्यात येईल, असे सांगितले. मात्र अद्यापही मुख्याध्यापकांना थकीत देयकाची रक्कम मिळाली नाही. परिणामी जिल्ह्यातील काही शाळांनी शालेय पोषण आहार देणे बंद केले आहे.देयकाची रक्कम न मिळाल्यास चित्र बिकटजिल्ह्यात जि.प.च्या एकूण १०६९ आणि खासगी शाळा ४०० शाळा आहेत. सर्वच शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र चार महिन्यांपासून पोषण आहार साहित्य खरेदीचे देयक थकीत असल्याने मुख्याध्यापकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत देयकाची समस्या मार्गी न लागल्यास ही समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.