शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:46 IST

आॅनलाईन लोकमतसोनपुरी : शालेय पोषण आहाराची देयके मागील चार महिन्यांपासून थकीत आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जवळचे पैसे खर्च करून पोषण आहार साहित्य खरेदी करणे बंद केले आहे. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.राज्यात शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत सर्व मुलांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद ...

ठळक मुद्देदेयके थकीत : शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका

आॅनलाईन लोकमतसोनपुरी : शालेय पोषण आहाराची देयके मागील चार महिन्यांपासून थकीत आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जवळचे पैसे खर्च करून पोषण आहार साहित्य खरेदी करणे बंद केले आहे. परिणामी जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.राज्यात शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत सर्व मुलांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत अनेक सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. राज्यात शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र व डिजिटल शाळा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केंद्र आणि राज्यात शासकीय आणि अनुदानित खासगी शाळांना मध्यान्ह भोजन योजना लागू आहे. सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो.मात्र मागील चार महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे देयक न निघाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील शिक्षक संघटनांनी एकत्र येवून जेव्हापर्यंत पोषण आहारासाठी अनुदान मिळत नाही तेव्हापर्यंत शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी साहित्य खरेदी करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.शाळांना केवळ तांदळाचा पुरवठासध्या प्रत्येक शाळांना फक्त तांदूळ पुरवठा होत आहे. भाजी आणि इतर किराणा सामान मुख्याध्यापकांनी खरेदी करावे, असे निर्देश शासनाने दिले आहे. देयक सादर केल्यानंतर देयकाची रक्कम देण्यात येईल, असे सांगितले. मात्र अद्यापही मुख्याध्यापकांना थकीत देयकाची रक्कम मिळाली नाही. परिणामी जिल्ह्यातील काही शाळांनी शालेय पोषण आहार देणे बंद केले आहे.देयकाची रक्कम न मिळाल्यास चित्र बिकटजिल्ह्यात जि.प.च्या एकूण १०६९ आणि खासगी शाळा ४०० शाळा आहेत. सर्वच शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र चार महिन्यांपासून पोषण आहार साहित्य खरेदीचे देयक थकीत असल्याने मुख्याध्यापकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत देयकाची समस्या मार्गी न लागल्यास ही समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.